जालन्यात भाजपाच्या जलआक्रोश मोर्चाला सुरुवात

शहरातील पाणी प्रश्नासह इतर प्रश्नावर मोर्चा काढण्यात आला
BJP Jal Akrosh Morcha
BJP Jal Akrosh MorchaSakal

जालना - शहरातील पाणी प्रश्नासह इतर प्रश्नावर भाजपाचा जलआक्रोश मोर्चा बुधवारी (ता.१५) काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे करीत आहे. शहरातील मामा चौक येथुन या जलआक्रोश मोर्चाला दुपारी साडेबारा वाजता सुरवात झाली. हा मोर्चा सिंधी बाजार, सराफा बाजार, काद्राबाद, सुभाष चौक, मंमा देवी, मस्तगड मार्गे गांधी चमन येथे या मोर्चाचा समारोप होणार आहे.

या मोर्चात भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार संतोष दानवे, आमदार नारायण कुचे, जिल्हा उपाध्यक्ष भास्कर दानवे यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी नगरपालिका प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबजी करत करत शहरातील नागरिकांना पाणी मिळालेच पाहिजे अशा घोषणा यावेळी देण्यात आला. शिवाय विविध फलक हातात घेऊन भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com