

Bombay High Court Takes Serious Note of RTI Violation by Kinwat Forest Official
esakal
ईस्लापुर: माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत मागवलेली माहिती देण्यास टाळाटाळ करणे आणि राज्य माहिती आयुक्तांच्या आदेशाची अवहेलना करणे नांदेड जिल्ह्यातील किनवट येथील वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याला चांगलेच महागात पडले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने (छत्रपती संभाजीनगर) या बेजबाबदार वर्तनाची गंभीर दखल घेतली आहे. न्यायमूर्ती एस. जी. चपळगावकर यांनी ६ जुलै २०२६ रोजी दिलेल्या एका अत्यंत महत्त्वपूर्ण आदेशात, प्रतिवादी क्रमांक चार म्हणजेच जन माहिती अधिकारी तथा वनपरिक्षेत्र अधिकारी किनवट, जिल्हा नांदेड यांना राज्य माहिती आयुक्तांच्या निर्देशानुसार संपूर्ण माहितीसह न्यायालयात प्रत्यक्ष हजर राहण्याचे अन्यथा आदेशाचे पालन नकरण्याचे कारण स्पष्ट करणारे प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे कडक आदेश दिले आहेत.