Vidhan Sabha 2019 : औरंगाबादच्या मध्य, पूर्वमधून बंडखोरांची माघार 

candidates of bjp and shivsena withdraws nomination forms in aurangabad
candidates of bjp and shivsena withdraws nomination forms in aurangabad

औरंगाबाद : जिल्ह्यासह शहरारातील मतदारसंघात भाजप आणि शिवसेनेने एकमेकांच्या विरोधात बंडखोरी केली होती. शहरातील औरंगाबाद मध्यमधून भाजपचे किशनचंद तनवाणी, पुर्व मधून शिवसेनेचे राजु वैद्य यांनी माघार घेतली तर पश्‍चिम मतदारसंघात शिवसेनेचे डोकेदुखी वाढणार असून येथे भाजपचे राजु शिंदे यांनी अर्ज कायम ठेवला आहे. शिवाय एमआयएमला सुद्धा मध्य मधून दिलासा मिळाला असून जावेद कुरैशी, नगरसेवक सय्यद मतीन यांनी अर्ज मागे घेतला आहे. 

औरंगाबाद शहरातील पुर्व मतदारसंघात शिवसेनेचे राजु वैद्य यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र तो त्यांनी पक्ष आदेशानंतर मागे घेतला त्यांच्यासोबत भाजपचे उमेदवार राज्यमंत्री अतुल सावे सुद्धा होता. आता येथे एमआयएमचे डॉ. गफ्फार कादरी, भाजपचे अतुल सावे, समाजवादी-कॉंग्रेस आघाडीचे कलीम कुरैशी यांच्यात तिरंगी लढत होईल. मध्य मतदारसंघात शिवसेनेचे प्रदीप जैस्वाल यांच्या विरोधात भाजपचे किशनचंदन तनावणी यांनी अर्ज भरला होता. तो त्यांनी परत घेतला. तसेच एमआयएमचे जावेद कुरैशी आणि नगरसेवक सय्यद मतीन यांनी सुद्धा अर्ज परत घेतल्याने एमआयएम उमेदवार नासेर सिद्दीकी यांना दिलासा मिळाला तर वंचितचे अमित भुईगळ मैदानात असल्याने येथे तिरंगी लढत होईल.

पश्‍चिम मतदारसंघात कॉंग्रेसचा उमेदवाराचा अर्ज बाद झाल्याने बंडखोरांपैकी कोण कायम राहते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. भाजपचे बाळासाहेब गायकवाड यांनी अर्ज मागे घेतला मात्र राजु शिंदे हे मैदानात असल्याने शिवसेनेचे संजय शिरसाट यांची डोकेदुखी वाढली आहे. आता येथे शिवसेना, वंचित, एमआयएम आणि अपक्ष अशी चौरगी लढत होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com