तिहेरी अपघातानंतर कार पेटली; महिलेचा जळून मृत्यू (व्हिडीओ)

Car burn after a triple accident at beed Womans death by burning in fire
Car burn after a triple accident at beed Womans death by burning in fire

गेवराई (जि. बीड) : तीन वाहनांच्या अपघातानंतर कारला आग लागली आणि कार पूर्ण जळून खाक झाली. आतमध्ये अडकलेल्या एका महिलेचा जळून जागीच मृत्यू झाला तर 14 वर्षीय मुलगीही भाजली आहे. ही घटना मंगळवारी (ता. 21) तालुक्यातील कल्याण - विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावरील कोळगाव नजीकच्या सुर्यमंदीर परिसरात घडली. मनिषा ज्ञानेश्वर जाधव (वय 35) असे या महिलेचे नाव आहे. तर, लावण्या ज्ञानेश्वर जाधव (वय 14) या भाजलेल्या मुलीवर बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे. 

परभणी येथे एका खासगी व्यवस्थापनात अभियंता असलेले ज्ञानेश्वर जाधव हे विवाहसमारंभासाठी पुण्याला गेले होते. मंगळवारी सकाळी ते आपल्या कारमधून पत्नी मनिषा व मुलगी लावण्यासह कल्याण विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गाने परत निघाले. साधारण 12 वाजेच्या दरम्यान गेवराई तालुक्यातील कोळगाव येथे एक जीप, त्यांची कार आणि अन्य एक असा तीन वाहनांचा अपघात झाला. अपघातानंतर त्यांच्या कारने अचानक पेट घेतला. यावेळी परिसरातील नागरिकांनी ज्ञानेश्वर जाधव आणि मुलगी लावण्याला मोठ्या धाडसाने बाहेर काढले. मात्र, आतमध्ये अडकलेल्या मनिषा जाधव यांचा जळून जागीच मृत्यू झाला. जखमींवर बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.


Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com