मराठवाड्यात दहावी, बारावीच्या परीक्षा केंद्रांत वाढ 

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

औरंगाबाद - महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावीची परीक्षा ता. एक मार्च; तर बारावी परीक्षा 21 फेब्रुवारीला सुरू होत आहे. मात्र, विद्यार्थीसंख्या आणि भौतिक सुविधा मिळण्याच्या हेतूने दहावी व बारावीच्या परीक्षा केंद्रांत 14-14 ने वाढ करण्यात आली आहे. आता मराठवाड्यातील 402 केंद्रांवर बारावीची; तर 630 परीक्षा केंद्रांवर दहावीची परीक्षा घेतली जाणार आहे.

 महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे औरंगाबाद विभागातील बीड, जालना, परभणी, हिंगोली आणि औरंगाबाद या पाच जिल्ह्यांतील एकूण 388 परीक्षा केंद्रांवर बारावीची परीक्षा घेतली जाणार होती. माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (दहावी) याच पाच जिल्ह्यांत 616 परीक्षा केंद्रांवर घेण्यात येणार असल्याचे मंडळातर्फे जाहीर करण्यात आले होते; परंतु दिवसेंदिवस परीक्षार्थ्यांच्या संख्येत होणारी वाढ, विद्यार्थ्यांना देण्यात आलेले दूरचे अंतर आणि विद्यालयांकडून परीक्षेसाठी पुरवण्यात येणाऱ्या भौतिक सुविधा कमी पडणे यांसारख्या अनेक कारणांमुळे दहावीच्या चौदा व बारावीच्या चौदा परीक्षा केंद्रांची वाढ करण्यात आली आहे.

 
यंदा औरंगाबाद विभागातून एक लाख 68 हजार 424 विद्यार्थी परीक्षेसाठी बसले आहेत. माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (दहावी) 2019 साठी औरंगाबाद विभागातील पाच जिल्ह्यांतून 616 परीक्षा केंद्रांत एक लाख 86 हजार 66 परीक्षार्थी आहेत. यासाठी 61 परिरक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com