शहरात पुन्हा येणार थंडीची लाट!

Cold
Cold

औरंगाबाद - आठवडाभरापासून थंडीत गारठलेल्या शहराला आणखी एक गारठाक बातमी आहे. पाच ते दहा जानेवारीदरम्यान पुन्हा एकदा या थंडीच्या लाटेला सामोरे जावे लागणार आहे. मुंबईमार्गे महाराष्ट्रात दाखल होणारी ही थंडी त्यानंतर दोन दिवसांत कमी होईल, असा अंदाज हवामानतज्ज्ञांनी वर्तवला आहे. 

गेल्या महिन्यांत थंडीच्या लाटेमुळे अवघे शहर गारठले होते. शनिवारी (ता. २९) पारा ५.८ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला. पश्‍चिम विक्षोपीय वाऱ्याने जोर धरल्याने पडलेली थंडी संक्रांतीपर्यंत कायम राहणार असल्याचा अंदाज हवामानतज्ज्ञ श्रीनिवास औंधकर यांनी व्यक्त केला. यात पुढील आठवड्यातले दोन दिवस थंडी जास्त राहणार असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे येणारा आठवडाभर थंडीपासून बचावासाठी नागरिकांना सज्ज राहावे लागेल.

मराठवाड्यासह देशभरात काही दिवसांपासून थंडीचा कडाका वाढला आहे. येत्या काही दिवस तो कायम असेल. सूर्यावरील हालचाली मंदावल्याचे खगोलशास्त्रज्ञांचे निरीक्षण असून, येत्या काळात सौरडाग न दिसण्याचे दिवस वाढणार आहेत. त्यामुळे सूर्याकडून होणाऱ्या उष्णतेच्या उत्सर्जनाचे प्रमाणही कमी असेल. सूर्याकडून मिळणाऱ्या उष्णतेत होणारी घट आणि त्यामुळे पृथ्वीवर वैश्विक किरणाचा वाढता मारा हे तापमानात घट होण्याचे कारण आहे. हे वाढत जाऊन हिमयुग येण्याची भीती नाकारता येत नाही.
- श्रीनिवास औंधकर, संचालक, एमजीएम एपीजे अब्दुल कलाम विज्ञान केंद्र.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com