Loksabha 2019 : औरंगाबादमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील वाद चव्हाट्यावर

Loksabha 2019 : औरंगाबादमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील वाद चव्हाट्यावर

औरंगाबाद: लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर औरंगाबाद राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षातील वाद चव्हाट्यावर येण्यास सुरुवात झाली असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदवीधर मतदार संघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी औरंगाबाद मधून लोकसभेची जय्यत तयारी केली होती. मात्र, काँग्रेसने अचानक सुभाष झांबड यांना उमेदवारी जाहीर केल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असंतोष दिसून येत आहे.

स्वतः सतीश चव्हाण देखील काँग्रेसच्या या निर्णयामुळे नाराज झाले आहेत. मात्र आघाडीचा धर्म आपण पाळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. चव्हाण यांच्या या निर्णयाचा त्यांनी पुनर्विचार करावा असा पवित्रा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष दत्ता भांगे आणि इतर पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे.

दत्ता भांगे यांनी राष्ट्रवादी भवन औरंगाबाद येथे झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात आपले मत व्यक्त करताना, सतिश चव्हाण यांना विनंती केली आहे की, त्यांनी आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करून काँग्रेस सारख्या दगाबाज पक्षाला धडा शिकवावा. जिल्हापरिषदेत असणारी काँग्रेस आणि शिवसेनेची युती जगजाहीर असताना, काँग्रेसने झांबड यांना उमेदवारी जाहीर करणे ही त्यांच्या गुप्त युतीचे द्योतक आहे. झांबड यांची शिवसेनेकडून मॅनेज करून आणलेली उमेदवारी आहे. त्यामुळे आ. चव्हाण यांनी आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करून खैरे यांच्या समोर भक्कम आव्हान उभे करून त्यांचा पराभव करावा असेही ते म्हणाले. यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील धुसफुस उघडकीस आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com