'मूठभर उद्योजकांना सोबत घेऊन देशाची लूट'

'मूठभर उद्योजकांना सोबत घेऊन देशाची लूट'

औरंगाबाद : देशात मूठभर उद्योजकांना सोबत घेऊन देश लुटण्याचे काम पंतप्रधान करत असल्याचा आरोप अखिल भारतीय युवक कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष केशवचंद यादव यांनी केला.

अखिल भारतीय युवक कॉंग्रेसतर्फे काढण्यात आलेली कन्याकुमारी ते काश्‍मिर "युवा क्रांती यात्रा' शहरात पोचली. यावेळी मंचावर युवक कॉंग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्रीनिवास बी. व्ही. महराष्ट्र प्रभारी प्रतिभाताई रघुवंशी, मनिष चौधरी, उत्कर्षा रुपवते, प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, जिल्हाध्यक्ष अब्दुल समीर, आमदार व जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तार, आमदार सुभाष झांबड, माजी आमदार कल्याण काळे, शहराध्यक्ष नामदेव पवार, जितेंद्र देहाडे हे ज्येष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. 

यावेळी बोलताना यादव म्हणाले, की लोकशाहीत महत्वपूर्ण असलेल्या सर्वोच्च संस्थांवर भाजपचे कब्जा मिळवण्याचे प्रयत्न चिंताजनक आहेत. देशाची अर्थव्यवस्था, बँकिंग व्यवस्था खिळखिळी झाली आहे. संघ व भाजपकडून संविधानविरोधी काम केले जात आहे. 

देशाच्या स्वातंत्र्य लढ्यापासून दूर पळणारे भाजप व संघाचे नेते देशभक्तीचे प्रमाणपत्र वाटत आहेत. 'अच्छे दिन'चे खोटे वादे करुन भाजपने फसवणूक केली आहे. हे सरकार उखडून टाकण्याची आपली जबाबदारी आहे, असे श्रीनिवास बी. व्ही. यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com