हे सरकार योजनांचे खून करणारे - देवेंद्र फडणवीस

जलआक्रोश मोर्चा : देवेंद्र फडणवीस यांची टीका; पाणी मिळेपर्यंत संघर्ष सुरुच
Devendra Fadnavis on public welfare schemes criticize Mahavikas aghadi government water issue jalna
Devendra Fadnavis on public welfare schemes criticize Mahavikas aghadi government water issue jalna sakal

जालना : राज्यात भाजपची सत्ता असताना सुरू केलेल्या विविध लोककल्याणकारी योजनांचा स्थगितीच्या नावाखाली महाविकास आघाडीच्या सरकारने खून केल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. हे सरकार केवळ ईश्‍वराच्या भरवशावर सुरू आहे. जोपर्यंत नागरिकांना रोज पुरेसे, शुद्ध पाणी मिळत नाही, तोपर्यंत भाजप संघर्ष करून राज्य शासनाला झोपू देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. जालना शहरातील पाणीप्रश्‍नावर भाजपने फडणवीस, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी जलआक्रोश मोर्चा काढला. त्यावेळी झालेल्या सभेत फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले. भाजपचे जिल्हाध्यक्ष, आमदार संतोष दानवे, आमदार अतुल सावे, आमदार नारायण कुचे, जिल्हा आदी मोर्चात सहभागी झाले होते.

फडणवीस म्हणाले, ‘‘जालन्यातील नागरिकांना मुबलक पाणी मिळावे यासाठी आमची सत्ता असताना जलवाहिनीसाठी १२९ कोटींचा निधी दिला होता. महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून या योजनेचे काम पुढे सरकले नाही. त्यामुळे पाणीप्रश्‍न सुटला नाही. १२९ कोटी देऊनही नागरिकांना पाणी मिळत नसेल तर राज्यकर्ते म्हणून घेण्याचा त्यांना अधिकार नाही. पाणीप्रश्न निर्माण झालेल्या मराठवाड्यातील अन्य भागातही भाजप संघर्ष करणार आहे.

फडणवीस यांचे टीकास्त्र

  • भाजपच्या सत्ताकाळातील योजनांना स्थगिती देणे, स्वतः काही न करता कामे पूर्ण होऊ न देणे हे या सरकारचे धोरण

  • ‘मराठवाडा वॉटर ग्रॅड’ योजनेसाठी सरकारने अडीच वर्षांत एक रुपयाही निधी दिला नाही.

  • समुद्रात वाहून जाणारे १९७ टीएमसी पाणी उचलून गोदावरी खोऱ्यात आणण्याच्या योजनेचाही राज्य सरकारने खून केला

  • ही योजना पाच ते सात वर्षांत पूर्ण झाली असती तर मराठवाड्यात पाण्यासाठी कधीच मोर्चे निघाले नसते

  • मागेल त्याला शेततळे, जलयुक्त शिवार, वैधानिक विकास महामंडळासह अनेक योजनांचे सरकारने खून केले

  • पिण्याचे पाणी घरांपर्यंत पोचविण्यासाठी केंद्राने दिलेला १३५ हजार कोटींचा निधीही खर्च केला नाही

  • तिन्ही पक्षांतील मराठवाड्यातील मंत्री शब्दही काढत नाहीत. ते वसुली, टक्केवारीत खूष आहेत

राज्यात पाच वर्षे भाजपची सत्ता होती. या काळातील हिशेब आम्ही देतो, तुम्ही अडीच वर्षांचा हिशेब द्या. आमदार, खासदार, नामदार हे जनतेचे सालदार असतात. सालदारांकडून हिशेब घ्यावा लागतो.

- रावसाहेब दानवे, रेल्वे राज्य मंत्री

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com