पश्‍चिम महाराष्ट्रात पूर, मराठवाड्याचा घसा कोरडा

File photo
File photo

सिरसाळा (जि. बीड) - पश्‍चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सोलापूर, सातारा जिल्ह्यात महापुराने हाहाकार उडालेला असताना मराठवाड्यात मात्र पावसाअभावी जमीन फाटू लागली आहे. 

बीड जिल्ह्यात तर भीषण परिस्थिती असून, निम्मा पावसाळा उलटला तरी अनेक गावांतील ग्रामस्थांना टॅंकरचे पाणी विकत घ्यावे लागत आहे. 
पावसाळा संपत आला तरी बीड जिल्ह्यात अजूनही मोठा पाऊस न झाल्याने पाणीटंचाईच्या झळा कायम असल्याचे दिसून येत आहे. 

सिरसाळा (ता. परळी वैजनाथ) येथील ग्रामस्थांना टॅंकरच्या विकतच्या पाण्यावरच तहान भागवावी लागत आहे. गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या सुकळी, गोवर्धन विहीर, बुरुज तलाव या योजना कोरड्याठाक आहेत. पाण्याची पातळी खोल गेल्याने विहीर, हापसा, बोअरला पाणी आले नाही. खासगी टॅंकरचालकांना पाण्यासाठी दूरवरून कसरत करावी लागत आहे. गावात सुमारे 20-22 पाण्याचे टॅंकर पाणी विक्री करीत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com