भोकरदन तालुक्यातील शेतकऱ्याची आत्महत्या

shinde
shinde

भोकरदन (जालना) : सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून भोकरदन तालुक्यातील बेल्होरा येथील शेतकऱ्यांने  गळफास घेऊन मृत्यूला कवटाळले. ही घटना शुक्रवारी (ता. 26) सकाळी सहा वाजेदरम्यान घडली. हरिभाऊ यादवराव शिंदे (वय 59) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे.

तालुक्यात गेल्या पाच वर्षांपासून सरासरीपेक्षा कमी पाऊस होत आहे. परिणामी शेतीला लावलेला खर्च देखील निघणे मुश्कील झाले आहे. त्यात यंदाच्या कोरड्या दुष्काळाने सामान्य माणसासह बळीराजा आर्थिक संकटात भरडल्या जात आहे. हरिभाऊ शिंदे यांना दीड एकर शेतजमीन आहे. पत्नी, दोन मुले, सुना व दोन विवाहित मुली असा त्यांचा परिवार. चार मुला, मुलींचे शिक्षण, लग्न त्यांनी शेतीत रात्रंदिवस काबाडकष्ट करून केले. परंतु पाच वर्षांपासून सततच्या दुष्काळ चक्रामुळे शेतात काहीच पिकत नाही, त्यामुळे शिक्षण, लग्न व शेतीसाठी घेतलेल्या कर्जाचे ओझे कमी होत नसल्याने कर्ज कसे फिटणार या विंचनेतून त्यांनी शुक्रवारी सकाळी स्वतःच्या शेतातील लिंबाच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे नातेवाईकांनी सांगितले. या प्रकरणी पोलिसांकडून पंचनामा करण्यात येत आहे.

आर्थिक संकटामुळे नैराश्य 
सलग पाच वर्षांपासून निसर्ग साथ देत नसल्याने बहुतांश शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले असून, आर्थिक चणचणीमुळे नैराश्य येत आहे. त्यात दैनंदिन जीवनातील गरजा, मुला, मुलींचे शिक्षण, लग्न आदी बाबींवर लागणाऱ्या खर्चासाठी अनेकजण नाईलाजास्तव खासगी बँका, पतसंस्था, फायनान्स कंपनी तसेच अवैध सावकाराकडून कर्ज काढत आहे. मात्र, शेतीच्या भरवशावर घेतलेल्या कर्जाचा फास दुष्काळामुळे दरवर्षी आणखी घट्ट आवळल्या जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com