बीड जिल्ह्यात शेतकऱ्याने नदीतच जाळून घेतले 

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Updated on

बीड - कर्जबाजारी शेतकऱ्याने नदीपात्रात जाळून घेतल्याची घटना समोर आली असून उपचारादरम्यान मंगळवारी (ता. 14) या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. शिवाजी भाऊसाहेब मोटे (वय 50, रा. ताकडगाव) असे मृताचे नाव आहे.

गुंदावाडी (ता. बीड) येथील तुकाराम उमाजी कानडे (वय 51) या शेतकऱ्यानेही विष पिऊन आत्महत्या केली. शिवाजी मोटे यांच्याकडे बॅंकेचे कर्ज आहे. त्यातच यंदा नापिकीमुळे कर्ज कसे फेडायचे, या विवंचनेत ते होते. दरम्यान, सोमवारी (ता. 13) रात्री मंदिरासमोर बसलेले शिवाजी मोटे अचानक नदीकडे गेले.

नदीत जाऊन अंगावर रॉकेल टाकून त्यांनी स्वत:ला पेटवून घेतले. परिसरातील ग्रामस्थांनी धाव घेऊन त्यांची आग आटोक्‍यात त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मंगळवारी पहाटे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान, दुसरी घटना तालुक्‍यातील गुंदावाडी येथे सोमवारी रात्री उशिरा घडली. तुकाराम कानडे या शेतकऱ्याने कर्जबाजारीपणातून विष पिऊन आत्महत्या केली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com