लग्नातील जेवणातून 180 जणांना विषबाधा

food poisoning
food poisoning

उदगीर : तोंडार (ता. उदगीर) येथे लग्नसमारंभातील जेवण केल्याने नागरिकांना विषबाधा झाल्याची घटना  घडली आहे. मात्र, तोंडार येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात दाखल झालेल्या 180 रुग्णांना  उपचार करण्यात आला  असुन  विषबाधा जेवणातून झाली की अन्य कारणांमुळे या बाबत आरोग्य विभागही संभ्रामात आहे.

मंगळवारी (ता. 14) तोंडार येथील  मनोहर बिरादार यांच्या मुलीचा लग्न समारंभ होता. या लग्नसमारंभात जेवणाच्या अनेक पंगती संपल्या.  लग्नसमारंभ पार पाडून वऱ्हाडी मंडळी नववधूला घेऊन मार्गस्थ झाल्यानंतर लग्नस्थळी घरी जेवण करून गेल्यानंतर काही नागरिकांना  पोटदुखी, उलट्या आणि मळमळ होण्याचा त्रास सुरू झाला. त्यामुळे त्या ग्रामस्थांनी तत्काळ प्राथमिक आरोग्य केंद्र जवळ  करुणयन दिवसभरात शासकीय रुग्णालयात तर खासगी रुग्नालयात  उपचार घेतले.

लग्नातील जेवणातूनच ग्रामस्थांचे आरोग्य बिघडले असल्याचा अंदाज लावून आरोग्य विभागाचे कर्मचारी लग्नघरी दाखल झाले. मात्र, तेथील जेवणाचे सर्व पदार्थ संपले. स्वयंपाकाची भांडी घासुन पुसून ठेवण्यात आली होती. लग्नात पिण्यासाठी पाण्याच्या जारचा वापर करण्यात आला होता. मात्र, ग्रामस्थांना नेमकी कोणत्या कारणामुळे विषबाधा झाली, याचे कारण अद्याप समजले नाही.माञ बिगर जारच्या पाण्याने केलेल्या मट्यामुळे विषबाधा झाल्याची चर्चा गावकरी करत होते. विषबाधा झालेल्या रुग्णांना प्राथमिक उपचार करून सोडून देण्यात आले असून रुग्णामध्ये वयोवृद्ध नागरिक तसेच लहान मुलांचाही समावेश होता. आरोग्य अधिकारी डॉ. विवेक टिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचार्‍यांनी उपचार केला.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com