औरंगाबादच्या कचराप्रश्‍नी दीड वर्षानंतर शासनाकडून दखल

Garbage
Garbage
औरंगाबाद - शहरातील कचरा गेल्या दीड वर्षापासून धुमसत आहे. नागरिकांची कचरा कोंडीतून सुटका करण्यासाठी शासनाने 91 कोटींचा डीपीआर (सविस्तर प्रकल्प अहवाल) मंजूर करूनही वर्ष उलटत आहे. मात्र, चार प्रकल्पांचे पुढे काय झाले, अशी विचारणा महापालिका आयुक्तांना दीड वर्षानंतर करण्यात आली आहे. त्यानुसार चिकलठाण्यासह इतर तीन प्रकल्पांची सध्या काय अवस्था आहे, याचे सादरीकरण आयुक्त गुरुवारी (ता. 20) मुंबईत करणार आहेत. नारेगाव (मांडकी) येथील कचरा डेपोला विरोध करीत परिसरातील ग्रामस्थांनी 16 फेब्रुवारी 2018 पासून आंदोलन सुरू केले होते. त्यानंतर शहरात कचऱ्याचा भडका उडाला. नगर विकास विभागाच्या तत्कालीन सचिव मनीषा म्हैसकर यांना शहरात येऊन कचऱ्याचा आढावा घेत नियोजन करावे लागले. राज्य शासनाने शहरातील कचऱ्याची काय अवस्था आहे, अशी विचारणा महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांच्याकडे केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com