सरकार यंदाच्या दुष्काळाची दखल घेईल : हरिभाऊ बागडे

fulambri
fulambri

फुलंब्री : यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे या वर्षीचा दुष्काळ अधिक कडक होण्याची शक्यता आहे. मात्र या दुष्काळाची दखल सरकार घेणार असल्याचे मत विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी मंगळवारी (ता. 2) व्यक्त केले. फुलंब्री तालुक्यातील बोरगाव अर्ज येथे पेंडगाव ते बोरगाव अर्ज या रस्त्याचे व सामाजिक सभागृहाच्या भूमिपूजन बागडे यांच्या हस्ते करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी माजी आरोग्य मंत्री डॉ. नामदेवराव गाडेकर, नगराध्यक्ष सुहास शिरसाठ, सभापती सर्जेराव मेटे, जिल्हा परिषद सदस्य अनुराधा चव्हाण, शिवाजीराव पाथ्रीकर, जितेंद्र जैस्वाल, उपसभापती एकनाथ धटिंग, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष दामू अण्णा नवपुते, पंचायत समिती सदस्य नाथा काकडे, सविता फुके, संजय त्रिभुवन, अप्पासाहेब काकडे, संजय पाथ्रीकर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात सभापती सर्जेराव मेटे यांनी सखोल मार्गदर्शन केले. त्यानंतर पुढे बोलताना बागडे म्हणाले की, बोरगाव अर्ज ते पेंडगाव या रस्त्यासाठी 71 लाख रुपये तर सभागृहासाठी दहा लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी दर्जेदार कामे करून घ्यावे. रस्त्याच्या कडेला नाले करु द्यावे, रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमण काढून दर्जेदार रस्ता बनवा.

तालुक्यातील अनेक ग्रामीण भागाच्या मार्गाचा दर्जा वाढवून जिल्हा मार्ग बनविले आहे. पाणी पुरवठा योजनेच्या प्रलंबित असलेले सर्व कामे तात्काळ निकाली काढून पुरत्वाकडे नेण्याच्या सूचना यावेळी अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. दुष्काळात एमआयडीसी मधून फुलंब्री तालुक्यातील गावांना फिल्टर पाण्याचा पाणीपुरवठा केलेला आहे. तसेच बोरगाव येथील पाणी पुरवठा योजना संबधित गुत्तेदाराकडून पूर्ण करून घ्याव्यात. योजना पूर्ण झाल्यानंतर गावंतर्गत पाईप लाईन टाकण्यासाठी आमदार निधीतून दहा लक्ष रुपये देण्यात येणार असल्याचे बागडे यांनी सांगितले. यावेळी कौशल्या जंगले, शिवाजी मेटे, उत्तम ठोंबरे, अमोल चव्हाण आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

काँग्रेस सरकारने पंधरा वर्षात दहा हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले. तर भाजप सरकारने केवळ चारच वर्षात 16 हजार कोटी रुपये दिले आहे. त्यात पुन्हा शेतकऱ्यांच्या हितासाठी पीक विमा, बोंडअळीचे अनुदान, कर्जमाफी आदी देऊन शेतकऱ्यांना धीर देण्याचे काम केलेले आहे. सतरा हजार कोटींच्या कर्जमाफीचा लाभ आतापर्यंत शेतकऱ्यांना देण्यात आलेला आहे. त्यामुळे सरकार दुष्काळाची वेळोवेळी दखल घेऊन शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे हरिभाऊ बागडे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com