भाजपा पुन्हा आली तर हिंदू-मुस्लिम वाद वाढतील : कन्हैय्याकुमार 

Hindu Muslim disputes will increase if BJP reregain power says Kanhaiyyakumar
Hindu Muslim disputes will increase if BJP reregain power says Kanhaiyyakumar

औरंगाबाद : देशाचे संविधान वाचवणे हेच खरे आजचे अव्हान आहे. भाजपा पुन्हा सत्तेत आली तर मुख्य प्रश्‍न बाजूला पडतील आणि हिंदू-मुस्लिम दंगे वाढतील. जातीपातीचे राजकारण वाढेल, म्हणून संविधानाला मानणाऱ्या वर्गाने एकत्र आले तर भाजपला हरवणे अवघड नाही. असा ठाम विश्‍वास जेएनयु विद्यापीठाचे विद्यार्थी नेते डॉ. कन्हैय्याकुमार यांनी व्यक्त केला. 

कन्हैय्याकुमार मराठवाड्याच्या दौऱ्यावर आलेले असताना, दिल्लीला जाण्यापुर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की ज्या संविधानावर देश उभा आहे, ते संविधान दिल्लीमध्ये राजरोसपणे जाळले जाते. सरकार त्यावर काहीही कारवाई करत नाही. ही गंभीर बाब असून, संविधान वाचवणे हे आज देशापुढे अव्हान आहे. भाजपाला केवळ 31 टक्के लोकांनी मत दिलेले आहेत. बाकी सर्वांनी एकत्र आले तर भाजपचा पराभव निश्‍चित आहे. हिंदूत्व आणि हिंदूवादी यात फरक आहे. भाजप हिंदुत्वाच्या नावाखाली हिंदु धर्माला मानणाऱ्यांच्या भावना भडकावून राजकारण करत असल्याचा आरोप त्यांनी केले. यावेळी डॉ. भालचंद्र कांगो, प्रा. राम बाहेती, अभय टकसाळ यांची उपस्थिती होती.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com