हिंगोली : जिल्ह्यातील ढगाळ वातावरणाचा तूर, हरभरा पिकांना धोका 

file photo
file photo

हिंगोली : जिल्ह्यात मागच्या चार ते पाच दिवसापासून तापमानात घट झाली आहे. कमाल तापमान २५ अंश सेल्सीअसवर आले आहे. ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने गहू, तूर तसेच हरभरा पिकांना धोका निर्माण  झाला आहे. 

जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी तुरीवर अळीचा प्रादुर्भाव झाला आहे  मागच्या आठवड्यापासून वातावरणात बदल झाला आहे. यावर्षी सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यांमध्ये अतिवृष्टीने कापूस, सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटकात सापडले आहेत. यावर्षी रब्बी हंगामातील पिकासाठी मुबलक प्रमाणात पाणी झाले. त्यामुळे शेतकऱ्यांनी हरभरा पिकांचा पेरा वाढविला आहे. 

खरीप हंगामातील सोयाबीन व कापूस हातचे गेले असले तरी रबी हंगामातील पिके साथ देतील, अशी अशा शेतकऱ्यांना आहे. सध्या ढगाळ वातावरणामुळे अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. ढगाळ वातावरण काही दिवस राहील असे कृषी विभागातर्फे सांगितले जात आहे.  

जिल्ह्यातील  यावर्षी रब्बी हंगामातील गहू पिकाचा पेरा १६ हजार ९९५ हेक्टर, ज्वारी ९ हजार १९९, हरभरा ५५ हजार ५८३, मका १९३, करडई १०० हेक्टरवर पेरणी झाली आहे. जिल्ह्यात ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांनी औषधाची फवारणी करावी व पिकाची योग्य ती काळजी घ्यावी असा सल्ला  कृषी विभागातर्फे देण्यात आला आहे.

संपादन-  प्रल्हाद कांबळे

 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com