

Jalna News
esakal
जालना: युद्धामुळे इंधन पुरवठा विस्कळित झाल्याचा बनाव पेट्रोल पंप धारकांकडून केला जात असला तरी प्रत्यक्षात तेल कंपन्यांकडून उधारीवर (क्रेडिटवर) इंधन देणे बंद झाल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. तेल कंपन्यांनी रोख रक्कम भरल्याशिवाय इंधन पुरवठा न करण्याचे धोरण स्वीकारल्याने अनेक पेट्रोल पंप मालक रोख रक्कम भरून इंधन उचलण्यास तयार नाहीत. परिणामी गुरुवारी (ता. २६) जालना शहरातील तब्बल १२ पेट्रोल पंप बंद होते.