Latur News : निलंग्यातील केळगाव बनतेय गुळाचे गाव! ; तीस गुऱ्हाळांमध्ये होतेय उसाचे गाळप, दरवर्षीचा उपक्रम

जवळपास दोन हजार एकर क्षेत्र असलेल्या केळगाव (ता. निलंगा) येथे चारशे एकर उसाचे क्षेत्र आहे. आंबुलगा कारखान्याच्या पायथ्याशी हे गाव आहे. असे असले तरी कोणत्याही कारखान्याच्या गाडीची अपेक्षा न करता ऊस थेट गुऱ्हाळासाठी जातो. त्यामुळे येथे तब्बल तीसपेक्षा अधिक गुऱ्हाळे गेल्या दोन महिन्यांपासून सुरू आहेत. कारखान्याच्या गाडी-टोळीची वाट कशाला बघताय, करा की गुऱ्हाळ सुरू, असाच संदेश या गावाने अन्य शेतकऱ्यांना दिलाय, असेच म्हणावे लागेल!.
nilanga
nilangalatur

निलंगा : जवळपास दोन हजार एकर क्षेत्र असलेल्या केळगाव (ता. निलंगा) येथे चारशे एकर उसाचे क्षेत्र आहे. आंबुलगा कारखान्याच्या पायथ्याशी हे गाव आहे. असे असले तरी कोणत्याही कारखान्याच्या गाडीची अपेक्षा न करता ऊस थेट गुऱ्हाळासाठी जातो. त्यामुळे येथे तब्बल तीसपेक्षा अधिक गुऱ्हाळे गेल्या दोन महिन्यांपासून सुरू आहेत. कारखान्याच्या गाडी-टोळीची वाट कशाला बघताय, करा की गुऱ्हाळ सुरू, असाच संदेश या गावाने अन्य शेतकऱ्यांना दिलाय, असेच म्हणावे लागेल!.

पूर्वी शेतकरी ऊस लागवड मोठ्या उत्साहाने करायचे. शिवाय कारखान्यांची संख्याही मर्यादित होती. त्यामुळे उसाचे करायचे काय, असा प्रश्न अनेकांपुढे असायचा. त्यातून गावागावात गुऱ्हाळासाठी ऊस गाळपासाठी चढाओढ असायची. क्रशरचा आवाज, कढईत उकळणाऱ्या रसाचा विशिष्ट गंध, तयार होणारा गूळ असे वातावरण दिसले की गुऱ्हाळ सुरू झाल्याचे जाणवायचे. गुऱ्हाळ सुरू झाले की दोन-दोन महिने चालायचे.

nilanga
Latur : नवे शैक्षणिक धोरण विज्ञान नाकारणारे ; प्रा. ऋषिकेश कांबळे,नवव्या राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलनाचे उद्‍घाटन

मजुरांना काम मिळायचे. गावच्या बाजूला असलेल्या गुऱ्हाळात उसाचा रस पिण्यासाठी खास निमंत्रण दिले जायचे. मोठ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे तर अनेक महिने गुऱ्हाळ चालायचे. अशांच्या गुऱ्हाळावर अन्य शेतकरी ऊस नेत असत. कालांतराने बाजारात गुळाचे गडगडणारे भाव, कमी झालेली मागणी, मजुरांची उणीव, कारखान्यांची वाढलेली संख्या आदींमुळे गुऱ्हाळचालकांचा उत्साह कमी झाला. अनेकांनी गावागावात असलेले गुऱ्हाळाचे साहित्य मोडीत काढले.

त्यामुळे गुऱ्हाळांची संख्या अतिशय कमी झाली आहे. कुठे तरी एक - दोन गुऱ्हाळे दिसत. अलीकडे मात्र गुळाला पुन्हा महत्त्व आले असून दरही चांगला मिळत आहे. त्यामुळे गुऱ्हाळे दिसू लागली आहेत.

सध्या साखर हंगाम सुरू आहे. कारखान्याने ऊस घेऊन जावा यासाठी अनेकवेळा शेतकऱ्यांना चकरा माराव्या लागतात. असे करूनही वेळेवर प्रश्न मार्गी लागत नाही. उसाला तेरा ते चौदा महिन्यांचा कालावधी झाला तरी तो तोडला जात नसल्याने अनेक शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. यातूनच केळगाव या गावाने अन्य शेतकऱ्यांसमोर वेगळा उपक्रम ठेवला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com