udagir
udagir

साहित्यिकांनी राजकारण्यांना योग्य दिशा दाखवावी: संभाजी पाटील-निलंगेकर 

कवी अटलबिहारी साहित्यनगरी (उदगीर) : साहित्य संमेलनाच्या माध्यमातून राजकारणाला दिशा देण्याचे काम झाले पाहिजे. एखादा व्यक्ती चुकीच्या दिशेने राजकारण करीत असेल तर त्यांनाही योग्य दिशा साहित्यिकांनी दाखवायला हवी आणि ही बाब राजकारण्यांनी मोठ्या मनाने स्वीकारायला हवी, असे मत पालकमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी मंगळवारी व्यक्त केले. 

मराठवाडा साहित्य परिषद आणि परिषदेच्या उदगीर शाखेच्या वतीने आयोजित ४०व्या मराठवाडा साहित्य संमेलनातील श्रोत्यांशी निलंगेकर यांनी संवाद साधला. या वेळी संमेलनाध्यक्ष ऋषिकेश कांबळे, परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील, आमदार सुधाकर भालेराव, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मिलींद लातुरे, स्वागताध्यक्ष रामचंद्र तिरुके, बस्वराज पाटील नागराळकर, माजी आमदार मनोहर पटवारी, भाजपचे जिल्हाध्यक्ष नागनाथ निडवदे, नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे उपस्थित होते.

निलंगेकर म्हणाले, समाजाचा आरसा म्हणजे साहित्य. समाजातील दशाल, वाईट प्रथा खंबीरपणे आपल्या शब्दांतून व्यक्त करण्याचे सामर्थ साहित्यिकांमध्ये असते. त्यांनी चुकीच्या पद्धतीने राजकारण करू पाहणाऱ्या राजकारण्यांना दिशा देण्याचे कामही करायला हवे. मराठवाड्याच्या भूमितील साहित्यिकांनी साहित्यात मोलाचे योगदान देऊन वेगळी ओळख तयार केली आहे. अशा साहित्यिकांच्या आणि संमेलनाच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहू.

दुष्काळवाडा ही ओळख पुसूया
लातूर पॅटर्नची सुरवात ही उदगीरपासूनच झाली असून उदगीर ही साहित्यिक, संताची भूमी आहे, असे सांगून निलंगेकर म्हणाले, ‘‘मराठवाड्याची होऊ पाहत असलेली ‘दुष्काळवाडा’ ही ओळख पुसण्यासाठी तात्पुरता विचार न करता त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी एकत्र आले पाहीजे. लातूर जिल्हा दुष्काळमुक्त करण्यासाठी राजकारणाच्या पलीकडे जाऊन विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com