Latur : शिक्षणातील मूल्यव्यवस्था उद्‍ध्वस्त ; डॉ. जयद्रथ जाधव यांचे मत,शासनाची धोरणे कारणीभूत

माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी सर्वांसाठी, सर्वसमावेशक आणि मूल्याधारित शिक्षण व्यवस्था असावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. आजची शिक्षण पद्धती मात्र भांडवलप्रधान व शोषण निर्माण करणारी झाली आहे. जागतिकीकरणानंतर शिक्षणाची जबाबदारी सरकार हळूहळू कमी करीत आहे. दोन हजार सालानंतर तर शिक्षण बहुजन, वंचित घटकांपासून दूर जात आहे. शिक्षणात देणग्यांना प्राधान्य आहे.
latur
latursakal

लातूर : माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी सर्वांसाठी, सर्वसमावेशक आणि मूल्याधारित शिक्षण व्यवस्था असावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. आजची शिक्षण पद्धती मात्र भांडवलप्रधान व शोषण निर्माण करणारी झाली आहे. जागतिकीकरणानंतर शिक्षणाची जबाबदारी सरकार हळूहळू कमी करीत आहे. दोन हजार सालानंतर तर शिक्षण बहुजन, वंचित घटकांपासून दूर जात आहे. शिक्षणात देणग्यांना प्राधान्य आहे. त्यामुळे शिक्षण धनदांडग्यांचे होत आहे. शासनाच्या कायम विनाअनुदानित धोरणामुळे शिक्षणातील मूल्यव्यवस्था उद्ध्वस्त केली जाते आहे, असे मत मराठवाडा साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष डॉ. जयद्रथ जाधव यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र प्रदेश शिक्षक प्रतिनिधी सभेच्या वतीने येथे नववे शिक्षक साहित्य संमेलन सुरू आहे. ‘शिक्षण काल, आज आणि उद्या’ या विषयावर बुधवारी झालेल्या परिसंवादात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रा. फ. म. शहाजिंदे होते. प्राचार्य डॉ. कुसुम मोरे, डॉ. ज्ञानदेव राऊत यांनी चर्चासत्रात सहभाग घेतला.

latur
Latur : नवे शैक्षणिक धोरण विज्ञान नाकारणारे ; प्रा. ऋषिकेश कांबळे,नवव्या राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलनाचे उद्‍घाटन

नवीन शिक्षण पद्धतीत ज्ञान, संस्कार, उपयोजन आणि व्यावसायिकता संपेल. प्राथमिक शिक्षकांना शंभर प्रकारची कामे, नोकरभरती बंद, विज्ञान- क्रीडा साहित्य नाही, अध्यापनाला शिक्षक नाहीत अशी स्थिती असताना अध्ययन-अध्यापनाची प्रक्रिया कशी सक्षमपणे पूर्ण होणार, हा प्रश्न आहे. जगाने ज्ञान-विज्ञान, तंत्रज्ञानाने प्रगती केली हे सत्य असतानाच नवीन शैक्षणिक धोरण हे मध्ययुगीन विचार देणारे आहे. यामुळे भारतीय समाजाला न्याय मिळणार नाही, असे ते म्हणाले.

प्राचार्य डॉ. कुसुम मोरे म्हणाल्या, ‘कालची शिक्षण पद्धती ही ध्येयाची, खस्ता खाणारी होती. ध्येयवादी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी खेड्यापाड्यापर्यंत शिक्षणाचा प्रसार केला. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या कार्यामुळे स्त्रिया, वंचित शिक्षणाच्या प्रवाहात आले. कायम विनाअनुदानित धोरणाने शिक्षणाचा लोककल्याणकारी ढाचा नष्ट होईल, अशी भीती आहे’. डॉ. ज्ञानदेव राऊत यांनी जुनी शिक्षण पद्धती ही गुरुकुल पद्धतीची होती तर आधुनिक कुलगुरू पद्धतीची आहे असे सांगितले.

कालिदास माने, अनंत कदम, गोविंद माने, नयन राजमाने, दयानंद बिरादार, योगीराज माने, यु. टी. गायकवाड, दिलीप गायकवाड उपस्थित होते. ब्रिजलाल कदम यांनी प्रास्ताविक केले. पतंगे यांनी सूत्रसंचालन केले. सुषमा गोमारे यांनी आभार मानले.

सर्वसमावेशक शिक्षणाचा अभाव

वर्ण-धर्मप्रधान व पुरुषसत्ताक समाज व्यवस्था ही गुलामीची आहे. गुलामीच्या वृत्तीमुळे समाजात शिक्षणाची मूल्ये रुजणार नाहीत. स्वातंत्र्यांनंतरच्या इतक्या वर्षांत सर्वसमावेशक शिक्षण झाले नाही आणि ते होऊच नये अशी परिस्थिती आहे, असे शहाजिंदे म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com