

Manoj Jarange Patil
Esakal
मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्या मान्य न झाल्यानं मुंबईला जाणारच यावर मनोज जरांगे पाटील ठाम झाले आहेत. त्यासाठी अंतरवाली सराटी इथं आज मराठा बांधवांसोबत झालेल्या बैठकीनंतर जरांगे पाटील यांनी मुंबईला जाण्याचा मार्ग, दिवस आणि नियोजन याची माहिती दिली. मुंबईतील आंदोलन कसं असेल, कुठून जायचं याचं सविस्तर नियोजन जरांगे पाटील यांनी सांगितलं. आपण सर्वांनी एकाच मार्गाने एकजुटीने मुंबईला जायचं असल्याचं जरांगे म्हणाले. शांततेत आंदोलन करायचं असल्याचंही जरांगे पाटलांनी यावेळी सांगितलं.