Manoj Jarange Patil : आरक्षण मिळाल्याशिवाय सरकारला सोडणार नाही

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरु केलेल्या दौऱ्यात बुधवारी (ता. ४) सकाळी चाकूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patilsakal

चाकूर - शासनाने मराठा समाजाला आरक्षण जाहीर करून सरसकट कुणबी जातीचे प्रमाणपत्र द्यावे, आरक्षणासाठी हा शेवटचा लढा असून आरक्षण मिळाल्याशिवाय सरकारला सोडणार नाही, असा इशारा मनोज जरांगे-पाटील यांनी दिला.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरु केलेल्या दौऱ्यात बुधवारी (ता. ४) सकाळी चाकूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. शहरातून रॅली काढून सोसायटी चौकात झालेल्या सभेत श्री. जरांगे-पाटील यांनी मार्गदर्शन केले.

तालूक्यातील समाज बांधवांच्या वतीने छोट्या मुलींनी त्यांचे औक्षण करून सत्कार केला. मराठा समाजाला आरक्षण मिळविण्यासाठी उभारलेला हा शेवटचा लढा आहे. आरक्षणाची लढाई अंतीम टप्यात असून, यात समाजाचा विजय होणार आहे. गटबाजी, मतभेद बाजूला सारून समाजासाठी सर्वांनी एकत्र येवून आरक्षणाचा लढा लढणे गरजेचे आहे.

आरक्षणाबाबत काहीजण संभ्रम निर्माण करीत आहेत, ज्यांना आरक्षण नको आहे त्यांनी घेऊ नये. परंतू इतरांना मिळत असल्यास त्यात खोडा घालण्याचा प्रयत्न समाज खपवून घेणार नाही. आंतरवाली सराटी येथे १४ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सभेला सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले.

टोकाची भुमिका नको...

आरक्षण मिळावे यासाठी काही तरुण टोकाची भूमिका घेत आहेत, समाजाला आरक्षण मिळणारच आहे. त्यामुळे आत्महत्या करू नका, आरक्षणाच्या लढ्याला गालबोट लागणार नाही यासाठी शांततेत आंदोलन करण्याचे आवाहन मनोज जरांगे-पाटील यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com