Maratha Reservation : सहा महिन्यात तिसऱ्यांदा मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण
वडीगोद्री - मराठा आरक्षण बाबत जे अध्यादेश व मसुदा शासनाने दिला आहे त्याची अंमलबजावणी करावी, अंतरवाली सराटी सह राज्यातील दाखल गुन्हे वापस घ्यावे, शासनाने सगे सोयरे यांचा कायदा पास करावा, विधिमंडळाचे दोन दिवसात अधिवेशन घ्यावे, हैद्राबाद व इतर ठिकाणचे गॅजेट स्विकारावे, आदी मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे शनिवार ता. 10 रोजी मनोज जरांगे हे सहा महिन्यात तिसऱ्यांदा आमरण उपोषण करत आहे.
या वेळी पत्रकार परिषदेमध्ये बोलतांना मनोज जरांगे यांनी सांगितले कि, उपोषण स्थळी समाज बांधवांची बैठक घेतली, शासनाने मराठा आरक्षण बाबत अध्यादेश व मसुदा दिला. परंतु, अध्यादेश व मसुदा याची अंमलबजावणी होत नाही, कुणबी जात प्रमाणपत्र वितरण झाले पाहिजे त्या साठी अभियान व शिबिराचे आयोजन होतांना दिसत नाही, आठ टक्के ग्रामपंचायत मध्ये फक्त यादी लावली आहे बाकी ठिकाणी यादी लावली गेली नाही.
वाटप झालेल्या प्रमाणपत्रच्या आधारे रक्तातील नातेवाईक, सगे सोयरे यांना लाभ मिळावा पाहिजे असे एक हि प्रमाणपत्र दिले गेले नाही, अंतरवाली सराटी सह राज्यात दाखल झालेले गुन्हे तात्काळ वापस घेतले गेले नाही, हैदराबाद व ईतर संस्थांचे गॅजेट स्विकारले नाही या कामाला शासनाकडून गती मिळाली नाही असे मनोज जरांगे यांनी सांगितले आहे.
शिंदे समीतीचे काम संथ गतीने सुरू आहे, मागासवर्ग अयोगाचा अहवाल स्विकारूण कायदा पास करावा, शासनाला संर्पकासाठी दारे खुले आहे सध्या शासनाने संपर्क केला नाही मागणी व अध्यादेश याची अंमलबजावणी होत नसल्याने परत उपोषण करावे लागत आहे असे मनोज जरांगे यांनी सांगितले.
संक्षिप्त
1) नाशिक जिल्ह्यातील साल्हेर किल्ला येथे दर्शन घेण्यासाठी गेलो असता पिकअप सारखे वाहान अतिवेगाने आले, आमचे सहकारी जोरात ओरडले, आम्ही त्या वेळी सावध भुमीका घेतल्याने हा धोका टळला आहे, हा घातपाताचा प्रकार असु शकतो याची चौकशी शासनाने करावी, या आगोदर देखील हिंगोली, अमरावती येथे हि आम्हाला असे अनुभव आले आहेत.
2) मला संरक्षण नको, आमचे बांधव यासाठी सक्षम आहे, झेड दर्जाची सुरक्षा मला नको ती मागणी समाज करत आहे समाजाला हे वाटणे सहाजिक आहे, घातपाताचा प्रकार होऊ नये यासाठी समाज बांधव सुरक्षाची मागणी करत आहे.
3) उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विनंती आहे, तुमच्या पक्षातील मंत्र्याला तुम्ही बळ देत आहात तेच मंत्री आपल्या मराठा समाजाला त्रास देत आहे, तुम्ही मंत्री छगन भुजबळ यांना समज द्यावी.
4) मंत्री छगन भुजबळ यांना जिवे मारण्याची धमकी आली. याबाबत आमचा काही संबंध नाही, समाज शांततेत आंदोलन करत आहे, आमच्या कडून असे प्रकार होत नाही, भुजबळ नेहमी आरक्षणकरीता विरोध करतात त्यांचे वय झाले त्यांनी विरोध करू नये.
5) मंडळ अयोगाला विरोध करूण गोर-गरीब ओबीसी समाजाचे नुकसान मला करायचे नाही. परंतु, आम्हाला तुम्ही विरोध करूण जर मराठा समाजाला आरक्षण मिळु देत नसाल तर आम्हाला या बाबत विचार करावा लागेल.
6) राज्यात गृह विभागाचा कारभार अजब आहे. जे दोषी आहे त्यांना सन्मान केला जातो, त्यांना सोयी सवलती दिल्या जातात. परंतु, आम्ही आमच्या न्याय हक्कासाठी आंदोलन केले तर आमच्यावर गुन्हे दाखल झाले, ते वापस घेतले जात नाही, मोठ्यातले मोठे गुन्हे वापस घेतले जातात, पण आमचे गुन्हे वापस घेतले जात नाही, गृह विभागाचा अजब कारभार आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.