Maratha Reservation : शासनाच्या दारात मरण आले तरी चालेल पण आरक्षण घेणारच - मनोज जरांगे

मराठा समाजाला आरक्षण मिळावे करीता शनिवार ता.20 रोजी मुंबईला निघत आहे आरक्षण मिळण्यासाठी शासनाच्या दारात मरण आले तरी आता माघार नाही आरक्षण घेऊनच परत येणार असे मनोज जरांगे यांनी शनिवार ता.20 रोजी अंतरवाली सराटी येथे पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.
maratha reservation manoj jarange
maratha reservation manoj jarangeSakal

वडीगोद्री : मराठा समाजाला आरक्षण मिळावे करीता शनिवार ता.20 रोजी मुंबईला निघत आहे आरक्षण मिळण्यासाठी शासनाच्या दारात मरण आले तरी आता माघार नाही आरक्षण घेऊनच परत येणार असे मनोज जरांगे यांनी शनिवार ता.20 रोजी अंतरवाली सराटी येथे पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.

या वेळी मनोज जरांगे यांनी सांगितले की, सात महिने झाले शासनाने आरक्षण प्रश्न सोडवला नाही, इतके नालायक सरकार पाहिले नाही, या आधी मुंबईला गेल्यावर आमरण उपोषण करणार होतो परंतु आता अंतरवाली सराटी येथुन च आमरण उपोषण करत मुंबईला जायचे आहे.

आरक्षण साठी कोण विरोधात आहे, कोण सोबत आहे हे आता दिसणारच आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत सात महिने पासून चर्चा चालू आहे निर्णय होत नाही.मुंबईला गेल्याशिवाय पर्याय नाही, 45 वर्षापासून समाज लढतो आरक्षण मिळत नाही,

आरक्षण करीता राज्यात अनेकांनी आत्महत्या केल्या आहेत ज्यांनी आत्महत्या केल्या त्यांच्या कुटूंबातील सदस्यांना विचारा याचे दुख किती आहे या वेळी जरांगे यांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले जरांगे या वेळी भावुक झाले. आरक्षण करीता हि टोकाची लढाई आहे यात बांधवांनी सहभागी व्हावे, नोदी सापडल्या तरी पण आरक्षण मिळत नाही,

छातीवर गोळ्या पडल्या तरी माग हटणार नाही, आता सर्वांनी बाहेर पडा,घरात बसु नका ,आरक्षण घेण्यासाठी मुंबईला चला, लोकांचे बलिदान डोळ्यासमोर दिसत आहे, मुले मोठे अधिकारी झाले पाहिजे, मुबंई वारी मध्ये जे मंत्री, आमदार,सहभागी होतील ते समाज म्हणून असतील, अंतरवाली सराटी सोडून निघालो कि माघार नाही, या पायी वारी मध्ये लोक टप्पा टप्याटप्याने सहभागी होणार आहे,

नोटीस केसेस देण हेच काम सरकारला आता राहीले आहे याला आम्ही भित नाही , शासनाने भ्रमांत ठेवले , तिन कोटी समाज बांधव मुबंईला येणार आहेत , प्रवास सुखरूप होणार साठी नियोजन केल आहे, आंदोलन लोकांना दाखवण्यासाठी नाही आरक्षण लढ्यासाठी आहे मला समाजाचा अभिमान आहे आत्ता पर्यंत शासनास आव्हान केले, काही हि झाले नाही आता माघार नाही, असे मनोज जरांगे यांनी या वेळी सांगितले.

अंतरवाली सराटी येथे रात्री पासून मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित झाला आहे, सर्वानी मुबंईला जायचे आहे तयारी करून आलो आहे असे सांगितले. या सर्वांना भागातील गावाच्या लोकांनी नास्ता, जेवण दिले. काही वेळात मुबंईला हे निघणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com