
Swami Ramanand Tirth, the spiritual leader and revolutionary who led the Marathwada Liberation Struggle against the mighty Nizam of Hyderabad
esakal
एकेकाळी हैदराबादचा निजाम, मीर उस्मान अली खान जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मानला जायचा. असं म्हणतात की तो हजार कोटींचा हिरा पेपरवेट म्हणून वापरायचा. त्याला ब्रिटिशांचा पाठिंबा होता, त्याच्याकडे आधुनिक शस्त्रास्त्रे आणि मोठा सैन्यफाटा होता. पण त्याच्याविरुद्ध उभे राहिले ते एक साधे मुख्याध्यापक—स्वामी रामानंद तीर्थ. त्यांचा पगार फक्त ५० रुपये होता, त्यांच्याकडे कोणतीही संपत्ती नव्हती, पण त्यांच्या मनात फक्त देशासाठी प्रेम आणि त्याग होता. याच त्यागाच्या जोरावर त्यांनी मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं.