औरंगाबाद : "विश्वचि माझे घर' अशी शिकवण देणारे ज्ञानेश्वर माऊली, उपेक्षितांच्या मुखी पंचपक्वानाचा घास घालणारे एकनाथ, "चिंता करितो विश्वाची' म्हणणाऱ्या रामदासांपासून कित्येक संतांनी आपल्या शिकवणीतून घालून दिलेली सहिष्णुतेची परंपरा मराठवाडा विसरलेला नाही, याची जाणीव पदोपदी येत आहे. दुष्काळाचे दुःख उरात तसेच दाबून संपूर्ण मराठवाड्यातून कोल्हापूर, सांगली, साताऱ्याकडे अस्मानी संकटात सापडलेल्या पूरग्रस्त बांधवांसाठी मदतीचा ओघ सुरू झाला आहे.
औरंगाबाद, जालन्यासह नांदेड, लातूर, हिंगोली, उस्मानाबाद, बीड आणि परभणीतून लोक भरभरून मदत देत आहेत. ही मदत पूरग्रस्तांपर्यंत पोहोचविण्यासाठी विविध सामाजिक संस्था सरसावल्या आहेत. जीवनावश्यक वस्तू, खाद्यान्नाच्या पाकिटांबरोबरच कपडे, पांघरुण, औषधीचे ट्रक ठिकठिकाणांहून रवाना होत आहेत. त्याशिवाय चादरी, चटई, दूध पावडर, बिस्कीटे, बेबी फूड, टॉवेल, कपडे व इतर जीवनावश्यक गोष्टींची मदत करण्यासाठी गावोगाव मदतफेऱ्या निघत आहेत. राजकीय पुढारी, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षण संस्थाचालकांनीही मदतीसाठी हात पुढे केला आहे. तरुणवर्ग हिरिरीने या मदतीचे वर्गीकरण, वाटप करण्यात आघाडीवर आहे. शाळकरी विद्यार्थ्यांनी कष्टाची कमाई करत आपला खारीचा वाटा उचलला आहे. मराठवाड्यातल्या गावागावांतून केवळ हळहळ व्यक्त न होता अगदी शेतकरी, कष्टकऱ्यांनी सहानुभूतिपूर्वक फूल ना फुलाची पाकळी मदत देऊ केली आहे.
हरेक जिल्हा सरसावला
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.