

'Uddhav Thackeray's Tour Is Too Late': Jyoti Waghmare Launches Verbal Attack
esakal
-अविनाश काळे
उमरगा : २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत उद्धव ठाकरे यांनी 'महायुती' चे मंगळसूत्र बांधुन जनमताचा कौल घेतला. मात्र त्यांनी काँग्रेसशी हातमिळवणी करत राजकिय अभिव्याचार केला. आता त्यांचे सहा खासदार पक्षांतर नव्हे तर, खऱ्या शिवसेनेत आले आहेत. ज्यांना आपले खासदार टिकवता येत नाहीत. त्यांनी आता राज्यात दौरा करून काय उपयोग. वराती मागून घोडे.. असा त्याचा अर्थ होते. परंतु यातील घोडे (उद्धव ठाकरे) अन् शिंगरू (अदित्य ठाकरे) यांचा करिष्मा चालणार नाही. अशी टिका राज्यसभेच्या खासदार ज्योती वाघमारे यांनी केली.