औरंगाबाद : 'सामुदायिक विवाह ही खरी विकासाची नांदी आहे. अधिकच्या खर्चाला फाटा देत तरुणांनी यासाठी पुढाकार घ्यावा', असे आवाहन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मदत व पुनर्वसन, भूकंप पुनर्वसन, अल्पसंख्याक विकास व वक्फ मंत्री दिलीप कांबळे यांनी शनिवारी औरंगाबाद देत केले.
काथार (कंठहार) वाणी समाज सेवा संघातर्फे आयोजित पहिले भव्य राष्ट्रीय अधिवेशन व वधू वर परिचय मेळाव्यादरम्यान ते बोलत होते.
कांबळे म्हणाले, की तुम्ही शासकीय जागेचा शोध घ्या. समाजाच्या मुलामुलींसाठी पाच कोटी रुपयांपर्यंत खर्च करून शासकीय वसतिगृह उभारून देईन. केवळ सवलती मिळताहेत म्हणून शिकू नका, तर समाज सुधारण्यासाठीही शिका. शिक्षणाशिवाय बदल अशक्य आहे.''
नोंदणी झालेल्या वधू वरांचा विवाह मोफत लावून देण्यात असल्याचे चंद्रकांत काथार यांनी सांगितले. यावेळी व्यासपीठावर विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष डॉ भागवत कराड, आमदार अतुल सावे, माजी केंद्रीय मंत्री जयसिंगराव गायकवाड, राजू वैद्य, समाज सेवा संघाच्या मुंबई अध्यक्षा संध्या बाविस्कर, औरंगाबाद अध्यक्ष चंद्रकांत काथार, माजी उप महापौर संजय केणेकर यांच्यासह सेवा संघाचे जळगाव नाशिक, पुणे, मुंबई येथील पदाधिकारी उपस्थित होते.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.