निलंगा : निलंगा येथील एका ओढ्याजवळ मालाने भरलेला कंटेनर पलटी होऊन कंटेनर खाली अडकुन तिघांचा मृत्यू झाला. हा अपघात गुरूवारी ता. एक रोजी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास झाला. एकाच गावातील तिघांचा मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे.
याबाबत मिळालेली माहीती अशी की, तालुक्यातील झरी येथील कृष्णा अर्जुन जाधव (वय वर्ष 22) व त्यांची चुलती कस्तुराबाई परमानंद जाधव (वय वर्ष 38 रा. झरी )हे दोघेजण आठ दिवसापूर्वीच खरेदी केलेल्या मोटरसायकल वरून शेताकडे दूध काढण्यासाठी जात होते.
समोरून उदगीर ते निलंगा मार्गावरून निलंग्याकडे येणाऱ्या कंटेनर क्रमांक डी.डी.ओ. एकआर 9071 याने मोटरसायकलला जोराची धडक मारल्याने पुतण्यासह चुलती जागीचा ठार झाले. तर या गावचे माहेरवाशी असलेली अक्षरा किशन सूर्यवंशी वय वर्ष 65 ही महिला पहाटे प्रात विधीसाठी जात होती.
मोटर सायकलसह कंटेनरची या महिलेलाही जोराची धडक लागल्याने तिघांचाही जागेचा मृत्यू झाला. हे तिघेही पलटी झालेल्या कंटेनर खाली अडकुन बसले होते. या विचित्र अपघाताने रस्त्यावर रक्ताचा सडा व मासाचे तुकडे पडले होते.
तब्बल तीन तास उदगीर निलंगा या मार्गावरची वाहतूक बंद होती. पोलिसांनी दोन क्रेन व एक जेसीबीच्या साह्याने रस्त्यावर आडवे पडलेल्या कंटेनरला बाजूला सारून वाहतूक सुरळीत केली कंटेनर व चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
दरम्यान मयताच्या प्रेताचे शवविच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात आले असून पोलिसांकडून घटनास्थळी भेट देऊन पंचनामा व गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.