हिंगोलीत नऊ कोरोनाबाधित रुग्णांची भर

file photo
file photo

हिंगोली: जिल्ह्यात बुधवारी (ता.दहा) नऊ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्याच बरोबर अकरा रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीबास यांनी दिली.

बुधवारी लिंबाळा येथील कोरोना केअर सेंटरमधील नऊ संशयितांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. यातील सहा व्यक्ती कलगाव येथील आहेत. तसेच सिरसम बुद्रुक, ब्राम्हणवाडा व सुकळी वळन येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. हे सर्व रुग्ण मुंबईहून हिंगोली जिल्ह्यात आलेले आहेत.

औरंगाबाद येथील रुग्ण कोरोनामुक्त

 त्याच बरोबर वसमत येथील कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या हट्टा, गिरगाव येथील प्रत्येकी दोन, कुरुडवाडी, हयातनगर, कौठा, वसमत शहर येथील प्रत्येकी एक अशा आठ रुग्णांसह औरंगाबाद येथे धूत हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेला रुग्ण कोरोनामुक्त झाला आहे. 

एकूण रुग्णांची संख्या २१० वर

तसेच जिल्हा रुग्णालयात उपचारघेत असलेले पहेणी येथील दोन रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या २१० झाली असून १८२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आता २८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

१९७ रुग्णांचे अहवाल प्रलंबित

आतापर्यंत जिल्ह्यातील आयसोलेशन वार्ड व कोरोना केअर सेंटरमध्ये एकूण दोन हजार ६३७ संशयितांना भरती करण्यात आले होते. त्यापैकी दोन हजार २०१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर दोन हजार २३१ जणांना घरी सोडण्यात आले आहे. सद्यस्थितीत ३९७ संशयित रुग्ण भरती असून त्यापैकी १९७ रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत.

मुंबईवरून परतलेल्या जवानांची तपासणी करणार

हिंगोली : कोरोना काळात मुंबई येथे कर्तव्यावर गेलेल्या ९० जवानांची एक तुकडी मंगळवारी (ता. नऊ) हिंगोली येथे दाखल झाली असून या सर्व जवानांची आरोग्य तपासणी करून स्वॅब नमुने प्रयोगशाळेकडे पाठविणार असल्याची माहिती राज्य राखीव दलाचे समादेशक मंचक इप्पर यांनी दिली.

बाळापूर नजीक कॅम्पमध्ये भरती

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हिंगोली येथील राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्या बंदोबस्तासाठी मुंबई येथे गेल्या होत्या. दोन महिन्यांनंतर मंगळवारी ९० जवानांची एक तुकडी हिंगोलीत दाखल झाली आहे. त्या सर्व जवानांना आखाडा बाळापूरनजीक असलेल्या कॅम्पमध्ये भरती करण्यात आले आहे. 

कोरोनाशी साम्य लक्षणे नाहीत

आता या सर्व जवानांच्या आरोग्याची तपासणी करून त्यांचे स्वॅब नमुने घेऊन नांदेड येथील प्रयोग शाळेकडे पाठविले जाणार आहेत. सध्या तरी कोणत्याही जवानात कोरोनाशी साम्य असलेली लक्षणे दिसून येत नाहीत. किरकोळ सर्दी, खोकला असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, स्वॅब नमुन्यांचा अहवाल प्राप्त होताच सर्व स्पस्ट होणार आहे. त्यामुळे तूर्तास तरी सर्व जवान ठणठणीत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com