Gadchiroli : विकासाचे तीन तेरा, श्रेयासाठी कलगीतुरा

समाजमाध्यमांवर कार्यकर्त्यांची हमरी-तुमरी; कामांसाठी आपापल्या नेत्यांचा जयघोष सुरू
gadchiroli news
gadchiroli news sakal

अहेरी - अहेरी विधानसभा क्षेत्राला नाना समस्यांनी घेरले असून जतनेला रोज असंख्य समस्यांना सामोरे जावे लागत आहे. विकासकामांचा प्रचंड दुष्काळ आहे. असे असताना जे काही एखाद दुसरे काम पूर्ण झाले त्याचे श्रेय लाटण्यासाठी कलगीतुरा सुरू असल्याचे दिसून येत आहे. पूर्ण झालेले काम आपल्याच नेत्याच्या प्रयत्नामुळे झाल्याचा डांगोरा पिटत विविध पक्षांचे राजकीय कार्यकर्ते समाजमाध्यमांवर हमरी-तुमरी करताना दिसत आहेत.

समाजमाध्यमांवर सध्या पक्षांचे कार्यकर्ते आपापल्या नेत्याला श्रेय देण्यासाठी वाद घालत आहेत. वेळोवेळी बदलत असणारे राजकीय समीकरणसुद्धा कार्यकर्ते आणि पक्षाच्या पदाधिकार्‍यांना डोकेदुखी ठरत आहे. कालपर्यंत सरकारच्या विरोधात बोलणारे उलट बोलणारे आता त्याच सरकारच्या कामाच्या श्रेयासाठी धडपडत आहेत. सत्ताधारी पक्षातले लोक अजुन केव्हा विकास होणार, अशी विचारणा करीत आहेत.

gadchiroli news
Pimpri-Chinchwad : अत्यावश्यक सेवा वगळता सांगवीत कडकडीत बंद दापोडीत संमिश्र प्रतिसाद

आता क्षेत्राच्या दुर्गतीसाठी दोष कोणाला द्यावा, हा प्रश्न राजकीय पक्षांच्याच कार्यकर्त्यांसमोर उभा ठाकला आहे. कोरोना, लाॅकडाउन आणि शासनाच्या उदासीन धोरणामुळे मागील तीन ते चार वर्षांपासून अहेरी उपविभागातील विकासाचा गाडा इंचभरही पुढे सरकला नाही.उलट अचानक वाढलेल्या जड वाहतुकींमुळे रस्त्यांचे नेटवर्क दयनीय अवस्थेत आहे. आरोग्य, वीजपुरवठा, पिण्याचे पाणी व शिक्षण अशा सर्व आघाड्यांवर अडचणींचे डोंगर उभे आहेत.

gadchiroli news
Pune News : बारामतीकरांनी अनुभवला दहीहंडीचा थरार...

दुर्गम भागात आरोग्याचे तीन तेरा वाजले आहेत. रुग्णांना उपचार करण्यासाठी दवाखाना आहे. पण डॉक्टर नाही, रुग्णवाहिका नाही, की एखाद्याचा मृत्यू झाला, तर त्याचा मृतदेह त्याच्या स्वगावी नेण्यासाठी शववाहिका नाही. खाटेवर बांधुन कावड करून त्या व्यक्तीचा मृतदेह न्यावा लागतो, अशी विदारक परिस्थिती आहे

.देशाचा अमृत महोत्सव साजरा होत आहे, पण दुर्गम भागांतील परीस्थितीत काहीच बदल झालेला नाही. आजही आदिवासी, गरीब, समाज मूलभूत सोयीसुविधांपासून वंचितच आहे. तरीही आपल्या जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींकडून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास झाल्याचे राज्याच्या विधानसभेत सांगतात.

gadchiroli news
PM Modi: 'D येणार आणि C जाणार..', 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचे पंतप्रधान मोदींचा फॉर्मूला काय आहे? जाणून घ्या

मागील अडीच वर्षांचे काळात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गडचिरोलीचे पालकमंत्री होते. आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या रूपाने जिल्ह्याला पालकमंत्री मिळूनही साडेतीन वर्ष लोटूनसुद्धा या क्षेत्राच्या परिस्थितीत दोघांच्याही कार्यकाळात फारसा फरक पडला नाही.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून जिल्ह्यातील जनतेला फार मोठी आशा होती. ते दोन-तीनदा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले पण ठोस कोणतेही आश्वासन जनतेला दिले नाही.

अहेरी शहरातील मुख्य व अंतर्गत रस्त्यावर खड्डेच खड्डे आहेत, अहेरी शहर अतिक्रमणाच्या विळख्यात आहे, शिक्षण व खेळाच्या सोयी नाहीत, ग्रामीण भागांत ऐन पावसाच्या दिवसांतही पाण्याची समस्या आहे, सरकारी रुग्णालयात डाॅक्टरांची अनेक रिक्त पदे आहेत, शिक्षकांची पदे रिक्त आहेत, सर्वच विभाग प्रभारींच्या भरवशावर आहेत.

आष्टी-आलापल्ली व आलापल्ली-सिरोंचा राष्ट्रीय मार्ग केवळ नावापुरताच असून या महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य आहे. अहेरी एसटी आगारात भंगार बसेस असल्याने प्रवाशांना त्रास होतो. अशा अनेक समस्यांची बजबजपुरी माजली असतानाही लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांमध्ये श्रेयाची चढाओढच सुरूच आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com