कळमनुरी तालुक्यात आता पाणीटंचाईचे संकट

maldhawanda gramast
maldhawanda gramast
Updated on

हिंगोली : एकीकडे कोरोनाचे संकट सुरू असताना काही गावात पाणी टंचाईचा सामना गावकऱ्यांना करावा लागत आहे. कळमुनरी तालुक्‍यातील माळधावंडा व पाणबुडे वस्‍ती (खापरखेडा) येथे पाणी टंचाई निर्माण झाल्याने या गावात टँकरने पाणी पुरवठा सुरू करावा, अशी मागणी जिल्‍हा परिषद सदस्य डॉ. सतीश पाचपुते यांनी उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर यांच्याकडे केली आहे.

सध्या कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाउन, संचारबंदी, जमावबंदी सुरू आहे. शहरासह ग्रामीण भागात देखील त्‍याचे पालन गावकरी करीत आहेत. मात्र काही गावात पाणी टंचाईचे संकट ग्रामस्‍थांसमोर उभे आहे. 

माळधावंडा व पाणबुडे वस्‍ती येथे पाणीटंचाई

गावातील विहीरीची पाणी पातळी खोलवर गेल्याने शेतशिवारातील विहीरीवर जावून पाणी आणवे लागत आहेत. कळमनुरी तालुक्‍यातील माळधावंडा व पाणबुडे वस्‍ती (खापरेखडा) येथे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. माळधावंडा येथील गावकऱ्यांना गावात पाणी टंचाईमुळे बोथी येथून पाणी आणावे लागत आहेत. 

मुलगी विहीरीत पडून जखमी

हे पाणी नेताना सोशल डिस्‍टन्स पाळणे शक्‍य होत नाही, दऱ्या खोऱ्यात असलेल्या विहीरीवर जावून पाणी आणावे लागत आहे. दरम्‍यान, माळधावंड येथे विहीरीचे पाणी आणताना शितल मस्‍के ही मुलगी विहीरीत पडून जखमी झाली आहे.

टँकरची व्यवस्‍था करावी

 यामुळे गावात टँकरची व्यवस्‍था करणे गरजेचे झाले आहे. या दोन्हीही गावचे टँकरचे प्रस्‍ताव पाठविण्यात आले असून ते मंजूर करून गावात टँकरची व्यवस्‍था करावी, अशी मागणी डॉ. पाचपुते यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

वन्यप्राण्यांची पाण्यासाठी भटकती

कळमनुरी तालुक्यातील बोथी, माळधावंडा, जांब, पोतरा, निमटोक, बोल्डा, सिंदगी परिसरात माळरान आहे. जंगल असल्याने वन्यप्राण्यांची संख्या जास्त आहे. पावसाळा, हिवाळ्यात जंगलात पाणीसाठा असतो. मात्र, उन्हाळ्यात पाणीसाठे आटत जातात. त्यामुळे वन्यप्राण्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

वन्यप्राणी जखमी होण्याचे प्रकार

वन्यप्राणी पाण्यासाठी मानवी वस्तीकडे धाव घेत आहेत. वन्यप्राणी मानवी वस्तीजवळ आल्यास कुत्र्यांच्या तावडीत सापडत आहेत. यातून वन्यप्राण्यांना जखमी व्हावे लागत आहे. दोन दिवसांपूर्वी पोतरा येथे हरणाचे पाडस कुत्र्यांच्या तावडीत सापडले होते. वेळीच गावातील काही ग्रामस्थांनी हरणाच्या पाडसाला कुत्र्यांच्या तावडीतून सोडवत वन विभागाच्या स्वाधीन केले. 

पाणवठे उभारण्याची गरज


उन्हाळ्यात जंगलातील पाणीसाठे आटत असल्याने वन्यप्राण्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे जंगलात पाणवठे उभारण्याची गरज निर्माण झाली आहे. पाणवठ्यात दररोज पाणी टाकल्यास वन्यप्राण्यांना याचा दिलासा मिळण्यास मदत होणार आहे.


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com