गावच्या गाव काढतंय कांद्याचं बी, आणि...

photo
photo

हिंगोली : तालुक्‍यातील वांझोळा, देवठाणा येथील साठ शेतकऱ्यांनी सत्तर एकरात कांदा बिजोत्‍पादनाची लागवड केली आहे. मागच्या वर्षी एका एकरात चार ते साडेचार क्‍विंटल उत्‍पन्न झाले. त्‍याला २८ हजार रुपयांचा भाव मिळाला. यामुळे यावर्षी शेतकऱ्यांनी क्षेत्र वाढविले आहे. यावर्षी देखील चांगले उत्‍पन्न होईल, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्‍त करीत आहेत.

हिंगोली तालुक्‍यातील वांझोळा, देवठाणा ही गावे पैनगंगा नदीच्या काठावर आहेत. तसेच या नदीवर असलेल्या बॅरेजसमुळे नदीपात्रात साठवणूक झालेल्या पाण्याचा लाभ या गावातील शेतकऱ्यांना होतो. विहीरी व विधंनविहीरीत मुबलक पाणीसाठा असतो. त्‍याचा लाभ शेतकरी कांदा बियाणासाठी करतात. वांझोळा येथे बाराशे; तर देवठाणा येथे एक हजारच्या आसपास लोकसंख्या आहे. 
मागच्या पाच ते सहा वर्षांपासून शेतकरी कांदा बिजाची लागवड करतात. मागच्या वर्षी एकरी चार ते साडेचार क्‍विंटल बीज झाले. त्‍याला २८ हजार रुपये क्‍विंटलचा भाव मिळाला होता.

कपंनीमार्फत जागेवरून खरेदी

पारंपरिक पिकांबरोबर काही वर्षांपासून शेतकरी कांदा बीज घेत आहेत. बुलडाणा जिल्‍ह्यात येणाऱ्या देळगाव राजा व पंचगंगा या गावातून बीजाची एका कपंनीमार्फत सुरवातील खरेदी केली. या वर्षी दीपावलीनंतर रामेश्वर गांवडे, देविदास ठाकरे, गणेश गावंडे, बालाजी ठाकरे, दशरथ गावंडे यांच्यासह तीस ते बत्तीस शेतकऱ्यांनी कांद्याचे बिजोत्‍पादन घेतले आहे. तसेच देवठाणा येथील पंचवीस शेतकऱ्यांनी कांदा बिजाची लागवड केली आहे. एप्रिल महिण्यात बिजाची काढणी होणार असून त्‍यानंतर त्‍याचा उतार किती येणार हे कळणार आहे.

२८ हजार रुपये क्‍विंटल प्रमाणे खरेदी 

मागच्या वर्षी एकरी तीन ते साडेतीन क्‍विंटलचा उतार आल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. बुलडाणा येथील एका कंपनीतर्फे जागेवरूनच २८ हजार रुपये क्‍विंटल प्रमाणे त्‍याची खरेदी केली होती. कांदा बिजासाठी एकरी पन्नास ते साठ हजार रुपये खर्च आला आहे. कमी खर्चात चांगले उत्‍पन्न यातून मिळत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. मात्र यासाठी चांगले वातावरण, वेळेवर पाणीपाळी देणे गरजेचे आहे. त्‍यासाठी पाणी देखील आवश्यक असल्याचे शेतकरी सांगत आहेत. यावर्षी कधी ढगाळ; तर कधी धुक्‍के पडल्याने त्‍याचा थोडाफार परिणाम पिकावर होणार असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

आर्थिक आधार मिळाला

पैनगंगा नदीवरील बॅरेसजमुळे पाणीसाठा तयार झाला आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी कांदा बीज घेण्याचा निर्णय घेतला. गावात चाळीस शेतकऱ्यांनी लावगड केली आहे. मागच्या वर्षी एकरी चार ते साडेचार क्‍विंटल बिजोत्‍पादन झाले. त्‍याला २८ हजारांचा भाव मिळाला. यामुळे दुष्काळी परिस्‍थितीत देखील शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळाला. यावर्षी त्‍याचे क्षेत्र वाढले आहे.
-रामेश्वर गावंडे, शेतकरी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com