उस्मानाबाद : जिल्ह्यामध्ये ५१ रुग्णाची वाढ झाली असुन दिवसभरामध्ये ३८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर एका कोरोनाबाधिताचा मृत्यु झाला आहे. जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांची संख्या १२ हजार २४४ इतकी झाली असुन त्याचे प्रमाण आता ८९.२४ टक्के झाल्याचे दिसुन येत आहे. तर मृत्युचा दर देखील वाढलेलाच असल्याचे चित्र आहे. सध्या ३.२४ टक्के मृत्युदर असल्याने चिंता कायमच आहे. मृत्युचा दर कमी झाल्यास नक्कीच परिस्थिती नियंत्रणात येईल असा विश्वास जिल्हा प्रशासनाकडुन व्यक्त होत आहे.
नवीन आलेल्या ५१ रुग्णापैकी दहा जणांचे स्वॅब पॉझिटिव्ह आले आहेत. तर ४१ जणांची अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. ९१ स्वॅब नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेमध्ये पाठविण्यात आले होते, त्यातील दहा जणाचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर ४९४ जणांची अँटिजेन टेस्ट करण्यात आली होती, तर त्यातील ४१ जणांची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. जिल्ह्यामध्ये उस्मानाबाद तालुक्यात २१ जणांना लागन झाल्याचे दिसुन येत आहे. त्यातील १९ जणांची अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली असुन दोन जण आरटीपीसीआरद्वारे बाधित झाले आहेत. इतर तालुक्यामध्ये एकेरी आकडा असुन तुळजापुर तीन, उमरगा सहा, लोहारा दोन, कळंब नऊ, वाशी तीन, भुम पाच व परंडा दोन अशी तालुकानिहाय रुग्णसंख्या दिसुन येत आहे. उमरगा तालुक्यातील येणेगुर येथील ५६ वर्षीय पुरुषाचा उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
उस्मानाबाद कोरोना मीटर
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.