उस्मानाबाद जिल्ह्याचा मृत्यूदर तीन टक्क्यांवर, आज २०६ जणांना कोरोनाची लागण

3corona_1180
3corona_1180

उस्मानाबाद : जिल्ह्यातील कोरोना मृत्यूदर तीन टक्के इतका आहे. मंगळवारी (ता.२२) जिल्ह्यात नवीन २०६ कोरोना बाधित रुग्णांची भर पडली असून सात बाधितांचा मृत्यू झाला आहे. मात्र मंगळवारी नवीन बाधितांपेक्षा घरी सोडलेल्या रुग्णांची संख्या जास्त असल्याने जिल्ह्यासाठी ही बाब समाधानाची ठरली. जिल्ह्यातील कोरोना संसर्गाने बाधित होणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे.

याशिवाय मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभाग प्रयत्न करूनही मृत्यूचे प्रमाण कमी होत नसल्याचे दिसून येत आहे. मंगळवारी जिल्ह्यातील मृत्यूदर तब्बल तीन टक्क्यावर आला आहे. त्यामुळे जिल्ह्यासाठी ही चिंतेची बाब ठरत आहे. विशेष म्हणजेच राज्याच्या तुलनेत हा मृत्यूदर जास्त असल्याने नागरिकांमध्ये भीती पसरत आहे.


उस्मानाबाद तालुक्यात सर्वाधिक बाधित
जिल्ह्यातून सोमवारी १६३ नमुने तपासणीसाठी पाठविले होते. यातील सर्वांचे अहवाल प्राप्त झाले असून ५५ जण पॉझिटिव्ही आढळून आले आहेत. तर १०१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. याशिवाय ६४० जणांची रॅपिड अँटिजेन चाचणी घेण्यात आली. यामध्ये १३९ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले असून ५०१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. उस्मानाबाद तालुक्यात सर्वाधिक ८५ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. उमरग्यातील ३४, तुळजापूर ३१ आणि कळंबमधील २१ बाधितांचा समावेश आहे.

सात जणांचा मृत्यू
जिल्ह्यात आतापर्यंत ५४ हजार ६९९ संशयितांची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये तब्बल १० हजार ५९२ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. हे प्रमाण १९ टक्क्यांवर गेले आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील सात हजार ५७९ रुग्ण उपचार घेऊन घरी गेले आहेत. दरम्यान मंगळवारी सात जणांचा मृत्यू झाला असून यातील तिघे तुळजापूर तालुक्यातील आहेत.

संपादन - गणेश पिटेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com