बीड - पालकमंत्री जिल्हा वाऱ्यावर सोडून पुण्याला रवाना झाले, असा टोला पालकमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना लगावून जिल्ह्याच्या मदतीचे काय, असा प्रश्न भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी माध्यमांना बोलताना उपस्थित केला. मदतीच्या आश्वासनाचे काय? मुख्यमंत्री नक्की मदत करतील. शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे. केंद्राची मदत येईलच. सारखे एकमेकांना बोट दाखवणे योग्य नाही. मी जेव्हा खुर्चीवर होते तेव्हा लोकांसाठी काम केले असल्याचे मुंडे यांनी सांगितले. मुंडे म्हणाल्या, की जलयुक्त शिवार योजना ही सकारात्मक योजना होती. त्यातून सर्व ठिकाणी चुकीची कामे झालेली नाहीत.
शेतकऱ्यांच्या पाठीमागे राज्य शासनाने उभे राहिले पाहिजे. मी स्वतः बांधावर गेले आहे. पिकांची नुकसान भरपाई द्यायला हवी. बीड जिल्ह्यामध्ये गेल्या दोन वर्षांत एक नवा पैसा आलेला नाही, अशी टीका पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केली आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.