परभणी : पावसाळ्यात आरोग्य सांभाळा...

साथरोग नियंत्रण कृती योजनेची अंमलबजावणी सुरू
rain
rainsakal

परभणी : पावसाळा ऋतू हा सर्वांच्या आवडीचा, या ऋतूचा आनंद घेण्यासाठी अनेकजण बाहेर फिरण्याचे किंवा सहलींचे नियोजन करतात. परंतु, या ऋतूचा आनंद घेण्याच्या आनंदात अनेक नागरिक हे आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. याकरिता परभणी जिल्ह्यात साथरोग पसरू नये, म्हणून आरोग्य विभागाने पावसाळ्यापूर्वी उपाययोजना केली असून, साथरोग नियंत्रण कृती नियोजन तयार करण्यात आले आहे. या कृती योजनेची अंमलबजावणी देखील सुरु करण्यात आली आहे.

पावसाळा सुरु झाला की, मोठ्या प्रमाणात विविध जिवोत्पत्तीची पैदास होत असते. पावसाळ्यात जिकडे- तिकडे पाणी मोठ्या प्रमाणात वाढत असते. गावातील, शहरातील नाल्या तुडूंब वाहतात. हे दूषित पाणी पिण्याच्या पाण्यात मिसळल्यास या पासून जलजन्य साथीचे रोग निर्माण होण्याची शक्यता असते. पावसाचे वाहणारे पाणी आड, विहीर, हातपंप, विंधन विहिरींचे पाणी दूषित करते. हे दूषित पाणी नागरिकांच्या पिण्यात आल्यामुळे विविध जलजन्य साथी उद्भवतात.

स्थानिक स्वराज्य संस्थांनी साथीच्या रोगांचा प्रादूर्भाव होऊ नये म्हणून काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. ज्या ठिकाणाहून पिण्यासाठी पाणी उपलब्ध होते, अशा विहिरी, हातपंपाच्या परिसरात १५ मीटरपर्यंत पाणी साचणार नाही व नळ योजनेतील नळ गळत्या, वॉल गळत्या दुरुस्त करणे, आड, विहिरींचे कठडे बांधून देणे, हातपंप, विंधन विहीर परिसर ५० फुटापर्यंत स्वच्छ ठेवणे, सांडपाणी वाहते ठेवणे, त्याचे कठडे फुटले असतील तर दुरुस्त करणे महत्त्वाचे आहे. नळ योजनेमध्ये दररोज ब्लिचिंग पावडर टाकून शुद्धीकरण करावे. तसेच हातपंप, विंधन विहिरींचे शुद्धीकरण देखील वेळो- वेळी करणे आवश्यक आहे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

  • आरोग्य केंद्रावर २४ तास सेवा कार्यरत

  • ता. १ जून ते २ ऑक्टोबरपर्यंत आरोग्य केंद्रे कार्यरत

  • प्राथमिक आरोग्य केंद्र, तालुका स्तरावर नियंत्रण कक्ष सुरु

  • जिल्हास्तरावर २४ तास नियंत्रण कक्ष सुरु

  • नियंत्रण कक्षाचा मोबाईल क्रमांक (८८०६३७९५३४)

जनावरांच्या गोठ्यांकडे द्या लक्ष

पावसाळ्याच्या दिवसांत गुरांचे गोठे, शेणखताचे खड्डे येथे मॅलॅथिऑन पावडर टाकावी. घराच्या आजूबाजूच्या परिसरातील नाल्या, गटारांत पाणी साचू न देणे, शोष खड्यांद्वारे पाण्याचा निचरा करणे, घर, परिसर तसेच गुरांचा गोठा स्वच्छ ठेवणे, घरातील कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे, घरातील अडगळी, भिंतीच्या भेगा बुजविणे, शेणाचे खड्डे वस्तीपासून दूर ठेवणे, डासांपासून होणारे आजार प्रतिबंधात्मक उपाययोजना अंतर्गत डास व किटकापासून बचाव करण्यासाठी झोपताना मच्छरदाणीचा वापर करणे, कोरडा दिवस पाळणे या प्रकारच्या दक्षता रोगांचा प्रादूर्भाव होऊ नये म्हणून घ्याव्यात.

पुरेसा औषध पुरवठा उपलब्ध

जिल्ह्यात साथरोग पसरु नये, म्हणून आरोग्य विभागाने साथरोग नियंत्रण कृती नियोजन तयार केले आहे. या कृती योजनेची अंमलबजावणी देखील सुरु करण्यात आली आहे. साधारणत: जिल्ह्यात पावसाळ्याचे ४ ते ५ महिने गृहीत धरुन ५ महिने पुरेल एवढा औषधींचा साठा पुरेशा प्रमाणात सर्व आरोग्य केंद्रात आणि तसेच जिल्हास्तरावर उपलब्ध करुन देण्यात आला आहे. जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर एकूण ३१ तर तालुका स्तरावर एकूण ९ आणि जिल्हास्तरावर १ आरोग्य पथके तयार करण्यात आली आहेत. एक विशेष पथक सज्ज ठेवण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com