Man Ki Baat : बहादरपुराच्या पेठकर कुटुंबाचे पंतप्रधान मोदींकडून ‘मन की बात’मध्ये कौतुक

बहादरपुरातील पेठकर कुटुंबाचा अनोखा उपक्रम; लग्नात साडेतीन हजार गावकऱ्यांना अपघाती विमा देऊन आनंद वाटला, ‘मन की बात’मधून पंतप्रधान मोदींकडून कौतुक
Pedhkar family from Nanded receives praise from PM Modi in 'Mann Ki Baat' for gifting accidental insurance

Pedhkar family from Nanded receives praise from PM Modi in 'Mann Ki Baat' for gifting accidental insurance

Esakal
Updated on

अर्धापूर : कंधार तालुक्यातील बहादरपुरा येथील सिद्धेश्वर पेठकर यांच्या विवाहसोहळ्याची सध्या संपूर्ण देशात चर्चा होत आहे. पेठकर कुटुंबीयांनी लग्नाचे 'रिटर्न गिफ्ट' म्हणून सुमारे साडेतीन हजार गावकऱ्यांना प्रत्येकी एक लाख रुपयांचा अपघाती विमा काढून दिला आहे. या अनोख्या आणि समाजोपयोगी उपक्रमाची दखल खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली असून, आजच्या 'मन की बात' या कार्यक्रमातून त्यांनी या घटनेची माहिती संपूर्ण देशाला देत पेठकर कुटुंबाचे भरभरून कौतुक केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com