औरंगाबाद - समांतर पाणीपुरवठा, भूमिगत गटार योजना, स्मार्ट सिटी, शंभर कोटींचे रस्ते अशा कोट्यवधी रुपयांच्या सुमारे 20 प्रकल्पांची महापालिकेने गेल्या अठरा वर्षांत वाट लावली आहे.
सातत्याने "नापास' होणारे प्रशासन व पदाधिकाऱ्यांवरील नागरिकांचा विश्वास आता पूर्णपणे उडाला असून, महापालिका बरखास्त करण्यासाठी नागरिकांना थेट न्यायालयात धाव घ्यावी लागली आहे. पाणी, रस्ते, स्वच्छता यांसारख्या सुविधा मिळत नसल्याने तब्बल 38 याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद येथील खंडपीठात दाखल झाल्या आहेत. पाणी डोक्यापर्यंत आल्यानंतर महापालिकेत आता "पळापळ' सुरू झाल्याचे चित्र आहे.
राज्याची पर्यटन राजधानी, मराठवाड्याची राजधानी, ऐतिहासिक शहर अशी बिरुदे मिरविणाऱ्या औरंगाबाद शहराची नवी ओळख कचराबाद, खड्ड्यांचे शहर, सर्वांत प्रदूषित शहर अशी होत आहे. शहराच्या या वाताहतीला जबाबदार कोण? असा जाब आता नागरिक विचारत असून, त्यासाठी न्यायालयाची दारे ठोठाविण्यात आली आहेत. महापालिकेत गेल्या वीस वर्षांपासून शिवसेना-भाजप युतीची सत्ता आहे. प्रत्येक निवडणुकीत मोठमोठी आश्वासने दिली जातात.
'सत्तेची फळे' चाखताना मात्र जनतेच्या तोंडाला पाने पुसली जात आहेत. गेल्या 18 वर्षांत महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी अनेक घोषणा केल्या. त्यामुळे नागरिकांनी विश्वास ठेवून पुन्हा-पुन्हा सत्ताही दिली; मात्र नागरिकांच्या नशिबी केवळ विश्वासघात आल्याचे चित्र आहे. आतापर्यंतच्या सुमारे 20 योजनांमध्ये महापालिका नापास झाल्याचे योजनांचा आढावा घेतल्यास स्पष्ट होते.
हे आहे महापालिकेचे अपयश
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.