हसनाबाद (जि.जालना) - भोकरदन तालुक्यातील परिसरात गेल्या आठवड्यापासून पावसाने कहर केला आहे. त्यामुळे मका सोयाबीन कपाशीचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे दिवाळीचा सण पाण्यातील मकाचे कणसे जमा करण्यात जात असल्याचे चित्र परिसरात आहे.
हसनाबाद परिसरात सततच्या पावसामुळे अनेकांची पिके पाण्याखाली आली. त्यातच सोंगणी केलेल्या मक्याचे कणीस पाण्यात बुडाले, अनेकांचे वाहून गेले. त्यामुळे शेतकऱ्यांचे दोन पैसे मिळविण्याचे स्वप्न भंगले आहे.
हसनाबाद परिसरातील शेतकरी दिगंबर लक्ष्मण वाघोले यांच्या दोन एकर शेतीतील एक एकर मका चाऱ्यासह वाहून गेला. तर रचलेला चाराही पूर्णपणे पाण्यात गेला आहे. वाघोले यांनी दोन एकर जमिनीत तीस हजार रुपये खर्च करून मका पीक घेतले होते; परंतु या अतिवृष्टीने त्यांचे जवळपास 70 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे; तसेच उरलासुरला मका जमा केलेल्या ठिकाणीच उगवला आहे. परिसरातील पिकांचे पंचनामे करावेत; तसेच नुकसानभरपाई द्यावी व ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी दिगंबर वाघोले, लक्ष्मण वाघोले, माणिक वाल्डे, किसन वाल्डे, नारायण जोशी व शेतकऱ्यांनी केली आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.