त्यांची पातळी कुठपर्यंत जाऊन पोहोचली हे लक्षता येतं : दानवे

danve
danve

औरंगाबाद : 'एवढ्या वरच्या पातळीचा नेता वैयक्तिक नावानिशी बोलतो तेव्हा त्यांची पातळी कुठंपर्यंत जाऊन पोहचली हे लक्षात येते. ते मलाच काय तर मोदीजींना, अमितभाईंना सुद्धा बोलतात. त्यांनी अशा प्रकराचे वक्‍त्यव करणे चुकीचे आहे. अशा वक्‍त्यव्यांनी कुटुता येत आहे. हे त्यांना वाटलं पाहिजे. त्यांना आम्ही कुठं काय बोलतोय. मला ही बोलता येतं, शब्द माझ्या जवळही आहेत' असा चिमटा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता काढला.

औरंगाबादेत जिल्हास्तरीय सीएम चषक स्पर्धेच्या उद्‌घाटनानंतर ते गुरुवारी (ता. 10) माध्यमांशी बोलत होते. एवढं होऊन ही युतीसाठी आम्ही सकारात्मक आहोत. आमची इच्छा आहे युती व्हावी. दोन्ही बाजुंनी योग्य वेळी प्रतिसाद मिळेल असा विश्‍वास दानवे यांनी व्यक्त केला. 

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या लातुरच्या सभेतील "पटक देंगे' वक्‍त्यव्यानंतर शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी भाजपवर जोरदार टिका केली होती. यानंतर उद्धव ठाकरे यांनी बीडच्या सभेत भाजपच्या नेत्यांवर जोरदार शाब्दीक हल्ला केला होता. रावसाहेब दानवे शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता म्हणाले की, आज नाही गेले अनेक दिवसांपासून ते नावानिशी टिका करतात. मात्र भारतीय जनता पार्टी टिका करत नाही. मागील 25 वर्षापासून आम्ही सोबत आहोत. राजकारण करतांना या पातळीवर जाऊन आम्ही कुणाच्या नावानिशी टिका टिप्पणी करत नाही. मग ती नावे नेत्यांचे असो की कार्यकर्त्यांची. अशी टिका टिप्पणी त्यांनी करु नये. 

मी 23 निवडणुका जिंकलो 
मी आजपर्यंत 24 निवडणुका लढलो. त्यापैकी 23 जिंकलो. प्रत्येक निवडणुकीत माझ्या विरुद्ध असेच बोलले जाते. आम्ही हरवु, पराभुत करु मात्र अजून त्यांना शक्‍य झाले नाही. मागे ही ते झाले नाही आता पुढे ही होणार नाही असे रावसाहेब दानवे स्वतःच्या जालना मतदारसंघाविषयी म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com