Jalna politics:'रावसाहेब दानवे-बबनराव लोणीकरांत दिलजमाई'; आगामी निवडणुकांचे चित्र बदलणार?, पाहणे औत्सुक्याचे ठरणार !

Maharashtra politics: जालना जिल्ह्यातील भाजपच्या राजकारणात मोठा भूचाल आणणारी घटना म्हणजे रावसाहेब दानवे आणि बबनराव लोणीकर यांच्यात झालेली दिलजमाई. गेल्या काही महिन्यांपासून दोन्ही गटांमध्ये मतभेद, आरोप-प्रत्यारोप आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण होते.
After months of tension, BJP leaders Ravsaheb Danve and Babanrao Lonikar finally come together, creating a fresh buzz in Maharashtra’s political landscape.

After months of tension, BJP leaders Ravsaheb Danve and Babanrao Lonikar finally come together, creating a fresh buzz in Maharashtra’s political landscape.

Sakal

Updated on

जालना : एकाच पक्षात राहून जिल्ह्याच्या राजकारणात स्वतःचा सवतासुभा निर्माण करणारे, दोन राजकीय कट्टर विरोधक अखेर दशकानंतर एकत्र आले आहेत. माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि माजी मंत्री, आमदार बबनराव लोणीकर यांच्यातील राजकीय वाद मिटल्याचा दावा दोन्ही नेत्यांनी एका जाहीर कार्यक्रमात केला आहे. दरम्यान, या नव्या राजकीय समीकरणामुळे जिल्ह्याच्या राजकारणावर काय परिणाम होणार, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे चित्र बदलणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com