पाच दिवसानंतर मोकळीक मिळाली अन् तोबा गर्दी झाली... कुठे ते वाचा...   

hingoli
hingoli

हिंगोली ः जिल्‍ह्यात ‘कोरोना’चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मागच्या पाच दिवसांपासून जीवनावश्यक वस्‍तू विक्रीच्या दुकानांसह बाजारदेखील बंद होता. दरम्‍यान, बाजार सोमवारपासून (ता.चार) सुरू झाल्याने खरेदीसाठी मोठी झुंबड उडाली होती. भाजीपाला, किराणा दुकाने, बँका, पेट्रोप पंपावर देखील मोठी गर्दी झाली होती. ही स्थिती जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पहावयास मिळाली. 

जिल्‍ह्यात ‘कोरोना’च्या रुग्णात होत असलेली वाढ पाहता मंगळवारपासून (ता.२८) जीवनावश्यक वस्‍तू विक्रीची दुकाने व भाजीपाल्याचा बाजार देखील बंद ठेवण्यात आला होता. दरम्‍यान, पाच दिवसानंतर सुरू झालेल्या बाजारात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. शहरातील विविध बँकेसमोर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तसेच बाजारात दुचाकी, चारचाकी वाहनाची देखील गर्दी झाली होती. यामुळे पेट्रोल पंपावर देखील दुचाकी वाहनधारकांच्या लांबच लांब रांगा होत्या.

कळमनुरीत दहा दिवसांनंतर सुरू झालेल्या बाजारात गर्दी
कळमनुरी ः पालिका प्रशासन व व्यापारी संघामधील वादानंतर दहा दिवसांनी उघडलेल्या किराणा दुकानांमधून जीवनावश्यक सामानाची खरेदी करण्याकरिता शहर व ग्रामीण भागातील नागरिकांनी सोमवारी (ता. चार) मोठी गर्दी केली. त्यामुळे किराणा दुकानांसमोर मोठ्या प्रमाणावर ग्राहकांच्या रांगा लागल्या. व्यापाऱ्यांनी सुद्धा नियमाच्या अधीन राहून सोशल डिस्टन्स पाळत व्यवहार केले.
मागील दहा दिवसांपासून शहरातील किराणा दुकाने बंद राहिली. परिणामी शहर व ग्रामीण भागातील नागरिकांची किराणा दुकानांमधून जीवनावश्यक सामान न मिळाल्यामुळे मोठी गैरसोय झाली. तर दुसऱ्या बाजूला व्यापारी वर्गाचेही मोठे आर्थिक नुकसान झाले. या सर्व घटनेनंतर सोमवारी उघडलेल्या किराणा दुकानांमधून सामान घेण्यासाठी ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांनी मोठी गर्दी केली. त्यामुळे सर्वच किराणा दुकानांसमोर ग्राहकांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.

औंढ्यामध्ये ‘फिजिकल डिस्टन्सिंग’ पाळत खरेदी
औंढा नागनाथ ः येथील नगर पंचायतीतर्फे शहरात पाच दिवसांनंतर सोमवारी (ता. चार) भाजीपाला बाजार, किराणा दुकान उघडण्यात आले होते. या वेळी सोशल डिस्टन्सिंग ठेवूनच ग्राहकांनी खरेदी केली. यासाठी नगर पंचायतीचे मुख्याधिकारी निशिकांत प्रंचडराव यांनी सर्वांना सूचना देत योग्य ते नियोजन केल्याने त्‍याचे पालन करण्यात आले. पाच दिवसांनंतर सुरू झालेल्या बाजारात दिलेल्या सूचनांचे सर्वांनी पालन केले होते. दुकाने व्यवस्थित आखून व दुकानांसमोर दोऱ्या लावण्यात आल्या होत्या. तसेच प्रत्येकाच्या हातावर सॅनिटायझर टाकले जात होते. तसेच मास्क लावा असेही सांगण्यात येत होते. तसेच शिस्तीत बाजार भरविण्यासाठी नगर पंचायतीने भरपूर मेहनत घेतली. बाजारात मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव, अविनाश चव्हाण, विजय महामुने, महादेव बळवंते, उतमराव राठोड, हरिहर गवळी, अनिल नागरे, सतीश रणखांबे, गंगाप्रसाद बुरकुले, विष्णू रणखांबे  हे हजर होते. तसेच शहरामध्ये गल्लोगल्ली फवारणी व साफसफाई करून स्वच्छता करण्याचे कामही नगर पंचायतीचे कर्मचारी करीत होते. 

ही दुकाने राहणार एक दिवसआड सुरु
सोमवारपासून सद्यपरिस्थिती शिथिलता देत किराणा माल विक्री दुकाने, भाजीपाला विक्री करणारे दुकाने, दुध विक्री केंद्र, परवाना असलेले चिकन, मटन शॉप, बेकरी, स्वीट मार्ट संबंधित दुकाने ठरवून देण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार एक दिवसआड सुरू करण्याचे आदेश जिल्‍हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिले आहेत. यासह कृषी केंद्रे, इलेक्‍ट्रीक वस्‍तू विक्रीची दुकाने सकाळी नऊ ते एक यावेळात सुरू झाली आहेत.

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com