Uddhav Thackeray : सरकारने दिलेले पॅकेज ही शेतकऱ्याची थट्टा- उद्धव ठाकरे!

Marathwada Drought : सरकारने तात्काळ शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी, जाहीर केलेले पॅकेज आम्हाला मान्य नाहीच, पण आता जाहीर केलेच आहे, तर ते तरी लवकर द्या, सरकारने दिलेले पॅकेज हे शेतकऱ्यांची थट्टा करणारे आहे असे प्रतिपादन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नांदर (ता.पैठण) येथे बुधवारी "दगा बाज रे" या शेतकरी संवाद दौऱ्यात केले.
Uddhav Thackeray slams government’s farmer package

Uddhav Thackeray slams government’s farmer package

sakal

Updated on

पाचोड : शेतकऱ्यांशी संवाद साधताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, 'गेल्या आठवड्यात शेतकरी एकवटला, त्यातून काहीतरी होईल असे मला वाटले.परंतु मुख्यमंत्र्यांनी परत एकदा कोपऱ्याला गुळ लावला अन् तीस जून तारीख दिली. शेतकऱ्यांत कर्ज फेडण्याची ताकद नाही उरली. शेतकऱ्यांच्या जमीनी, पिके खरडून गेले, त्यात मातीऐवजी दगडं राहीलीत, सरकारने त्यांना दिलेले पॅकेज ही थट्टा आहे,पीक विम्याचे ४० ते ५० हजार रुपये मिळायला हवे होते. मोसंबीला ८० हजार रुपये मिळायला हवे होते. कापसाला आणखी काही वेगळे हवे होते. परंतु पीक विम्याचे अकोल्यातील शेतकऱ्यांना दोन रुपये, तीन रुपये मिळाले. पालघरमध्ये अडीच रुपये मिळाले. सरकारने शेतकऱ्यांची थट्टा सुरू केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com