युती झाली म्हणून काय झालं, मी मैदान सोडलेलं नाही: खोतकर

Arjun Khotkar
Arjun Khotkar

जालना : काल झालेल्या बैठकीत युतीची घोषणा झाली असली तरी कोणता मतदार संघ कुणाला याबाबत निर्णय झालेला नाही. त्यामुळे सध्या भाजपच्या ताब्यात असलेल्या जालना लोकसभा मतदार संघाचं मैदान आपण अजूनही सोडलेलं नाही, असे शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी म्हटले आहे.

शिवसेना -भाजप युतीची घोषणा संयुक्त पत्रकार परीषदेत करण्यात आली. या घोषणेनंतर जालना लोकसभा मतदार संघात एकमेकांना आव्हान देणाऱ्या भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांचं काय होणार याकडे देखील महाराष्ट्राचं लक्ष लागलं होते.

युतीच्या निर्णयाच स्वागत आणि आदर करतो. पक्ष प्रमुखांना बोलून पुढची रणनीती ठरवू असे देखील खोतकर यांनी म्हटले आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर जालना लोकसभा मतदार संघ शिवसेनेकडे आल्यास लोकसभा निवडणुक लढवूच असं देखील खोतकरांनी स्पष्ट केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com