तुळजापूर : तालुक्यातील १९ गावातून सुरत-चेन्नई महामार्ग जाणार आहे. परंतु, या महामार्गात जाणाऱ्या शेत जमिनीच्या मावेजाबाबत शेतकरी संभ्रमावस्थेत असल्याचे दिसून येत आहेत. तालुक्यातील १९ गावामधून सुरत-चेन्नई रस्ता जाणार आहे.
यात जाणाऱ्या कोरडवाहू क्षेत्रास तीन लाख रूपये आणि बागायत क्षेत्रात आठ लाख रूपये मिळण्याचा अंदाज आहे. त्यातच सुरत-चेन्नई रस्ता जाणाऱ्या अनेक ठिकाणी यापूर्वी जमिनीचे खरेदी विक्रीचे व्यवहार झालेले आहेत.
२०१३ च्या सरळ खरेदीच्या पाचपट मोबदला द्यावा, असा सरकारचा निर्णय आहे. त्यासाठी सर्वसाधारण मोजणी हि अनेक ठिकाणी झालेली आहे. ज्यांच्या जमिनी जाणार आहेत ते शेतकरी सध्या नाराज आहेत.
या १९ गावातील जवळपास ११०० शेतकरी बाधित होणार आहेत. अनेक महामार्ग राज्यात झाले तथापि अनेक शेतकऱ्यांना चांगला मावेजा मिळाला. मात्र सूरत- चेन्नई रस्त्यास कमी मावेजा मिळेल, अशी शेतकऱ्यांची भावना बनली आहे.
पांगरधरवाडी, खुंटेवाडी, सांगवी, मांळुब्रा, पिंपळा खुर्द, पिंपळा बुद्रुक, देवकुरूळी, खडकी धोत्री, काटगांव, काटी यासह तालुक्यातील १९ गावातून सूरत-चेन्नई महामार्ग जाणार आहे.
काटी गावातील १२५ शेतकऱ्यांच्या जमीनी रस्त्यात जाणार आहेत. यापूर्वी मोजणी झालेली आहे. तथापि अनेक झाडे मोजणीत घेतलेली नाहीत. २०१३ चा कायदा सरळ खरेदीच्या पाचपट मावेजा शेतकऱ्यांना द्यावा, अशी तरतुद आहे. आम्ही सरकारकडे पाठपुरावा केला आहे. मात्र आम्हाला अद्याप कोणताही सरकारकडून प्रतिसाद मिळालेला नाही.
-नाबाजी ढगे, शेतकरी, काटी
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.