....तर शेतकऱ्यांचा लाभ थांबणार

File photo
File photo

नांदेड : पीएम किसान योजने अतंर्गत जिल्ह्यातील तीन लाख ९१ हजार ७३८ पात्र शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर अपलोड केली आहे. परंतु, यातील दोन लाख ५६ हजार नावे आधारनुसार नसल्यामुळे शेतकऱ्यांची स्वत: अथवा सीएससी केंद्राच्या माध्यमातुन ते दुरुस्त करावे लागणार आहे. अन्यथा अशा शेतकऱ्यांचा लाभ तात्पुरत्या स्वरुपात थांबविण्याचे संकेत केंद्राने दिले आहेत. दरम्यान शेतकऱ्यांनी आधारनुसार नावात बदल करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांनी केले आहे.

केंद्र शासनाने शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेतंर्गत वर्षाला सहा हजार रुपये देण्याचा कार्यक्रम होती घेतला. यानुसार पहिला हप्ता वर्ग झाला. परंतु, यानंतर शेतकऱ्यांची नावे आधारनुसार नसल्यामुळे त्यांना दुरुस्तीसाठी (ता.३०) नोव्हेंबरची मुदत दिली होती.

हेही वाचा - ‘या’ झेडपीतील दावेदारांमध्ये कारभारीपदासाठी रस्सीखेच ​

आधारप्रमाणे नावात दुरुस्ती करावी                                                    यानंतर नावात दुरुस्त झाली नाही तर या योजनेचा लाभ तात्पुरता थांबविण्याचे केंद्राने राज्याचे कृषी आयुक्त एकनाथ डवले यांच्यामार्फत कळविले आहे. यामुळे शेतकऱ्यांनी आधारप्रमाणे नावात दुरुस्ती करावी, असे आवाहन श्री.डोंगरे यांनी केले आहे.

आधार दुरुस्ती करण्याची सुविधा उपलब्ध                                      त्याकरिता ‘पीएम किसान’ पोर्टलवर पात्र लाभार्थींना नावे आधारप्रमाणे दुरुस्त करण्यासाठी ‘फामर्स कॉर्नर’ मध्ये ‘इडिट आधार फेलूर रेकॉर्ड’ ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधेमार्फत योजनेच्या लाभार्थींना पोर्टलवर जाऊन स्वत: दुरुस्ती करता येईल. तसेच आपले सरकार सेवा केंद्रामार्फत लाभार्थींना आधार दुरुस्ती करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

हे तुम्ही बघाच - Video -‘फिटनेस’ साठी पोहण्याचा व्यायाम ‘परफेक्ट’ ​

साठ हजार नावात दुरुस्ती झाली                                                        त्यामुळे प्रत्येक गावातील आपले सरकार सेवा केंद्राच्या सुविधेमार्फत मोठ्या प्रमाणात पात्र लाभार्थी, त्यांचे आधारकार्ड आधारित माहिती ‘पीएम किसान’ पोर्टलवर सुधारित करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, मागील काही दिवसांत जिल्हा प्रशासनाने तहसीलदार तसेच महसूल अधिकारी - कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या नावात दुरुस्ती करण्याचे काम हाती घेतल्यामुळे सध्या साठ हजार नावात दुरुस्ती झाली आहे. उर्वरीत एक लाख नव्वद हजार नावात लवकरच दुरुस्ती होइल, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com