राफेलपेक्षाही पिकविम्याचा घोटाळा मोठा : उद्धव ठाकरे

jalana
jalana

जालना : मराठवाड्यात सध्या दुष्काळामुळे आक्रोश- आकांत सुरू आहे. पंतप्रधान मात्र दुष्काळावर शब्दही न बोलता केवळ नवनवीन योजनांची घोषणा करीत  उद्घाटनाची नारळे फोडत फिरत आहेत, दुष्काळग्रस्त शेतकर्यांना मात्र प्रत्यक्षात कुठलीही मदत दिली जात नाही,असा निशाणा शिवसेनेचे पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर साधला.राफेल घोटाळ्यापेक्षा देशात विमा कंपन्याचा घोटाळा अधिक मोठा असल्याचे ठाकरे  म्हणाले.

मराठवाड्याच्या दुष्काळी भागात जाऊन ठाकरे शेतकर्यांशी संवाद साधून त्यांना धीर देत आहेत. बुधवारी (ता. 9) दुपारी बीड येथील सभा आटोपून ठाकरे यांनी जालन्यातील मोतोश्री लॅान्स येथे काही काळ  शेतकर्यांशी संवाद साधला.

यावेळी त्यांच्या हस्ते शेतकऱ्यांना पशुखाद्य व इतर मदत वाटप करण्यात आली.यावेळी रामदास कदम, एकनाथ शिंदे, अर्जुन खोतकर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपसि्थत होते. ठाकरे म्हणाले की, विमा कंपन्या शेतकऱ्यां ॉकडून विम्यापोटी रक्कम भरून घेतात, पंरतु शेतकऱ्यांना तुटपुंजी रककम दिली जाते. देशातील विमा कंपन्याचा घोटाळा हा राफेलच्या घोटाळ्यापेक्षाही मोठा आहे. शिवसेना नेहमीच शेतकऱ्यांच्या बाजूने ठामपणे उभी राहिली आहे. जेव्हा शेतकऱ्यांनी संप पुकारला तेव्हा शिवसेनेने पाठिंबा दिला होता, याची आठवण करून देत ते म्हणाले की, सरकारने 3 हजार कोटी रूपयांची पीक कर्जमाफी योजना जाहीर केली. पंरतु, प्रत्यक्षात या योजनेचा शेतकऱ्यांना लाभ मिळाला नाही. यावेळी  त्यांनी उपस्थित शेतकर्यांशी थेट संवाद करीत किती जणांना या योजनेचा लाभ मिळाला याची विचारणा केली असता एकाही शेतकर्यांनी हात वर केला नाही. मग या योजनेचे पैसे कुठे गेले असा सवाल त्यांनी सरकारला केला.रडतात साले, असा शेतकर्यांच्या उल्लेख करणार्यांना आता शेतकरी रडवतील असेही ते म्हणाले. 

दुष्काळी मदत मिळेना
अॅाक्टोबर महिन्यात दुष्काळ सुरू झाला. केंद्रांच पथक येऊन गेलं.पंरतु शेतकऱ्यांना अद्यापही मदत मिळाली नाही.निवडणुका आल्या की सगळेच येतात पंरतू मी शासकीय यंत्रणेचा सुस्त झालेल्या अजगराला जागे करण्यासाठी मराठवाड्यात फिरत असल्याचे स्पष्ट करून शिवसेनेकडून,जी मदत  दिली जाईल त्या मदतीचा स्वीकार करावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.  

तर आता पेटवा की रान ...
जालना जिल्ह्यात शेतकर्यांच्या उसाला रामेश्वर साखर कारख्यान्याकडून कमी भाव दिल्याचा उल्लेख राज्यमंत्री खोतकरांनी आपल्या भाषणात केला होता.याविरूध्द आम्ही रान पेटवणार आहोत,पंरतु तुमचा आशिर्वाद हवा असे खोतकर यांनी भाषणात म्हटले होते,हाच धागा पकडीत ठाकरे म्हणाले की, पेटवा की रान,तु्म्हाला कोणी रोखले आहे,मोकळीक आहे.सभेला, भास्कर अंबेकर, ए.जे.बोराडे,अनिरूध्द खोतकर, संतोष सांबरे यांच्यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती  होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com