
योगेश काशिद, बीड: बीडच्या दगडवाडीत गावगुंडांकडून शेतकऱ्यांना धमकी मिळत असल्याचे समोर आले आहे. 138 एकर जमीन बळकवण्याचा राजकीय गुंडांचा डाव आहे. गावगुंडांकडून पाच लाख रुपये द्या आणि एक एकर जमीन द्या अशी खंडणीची मागणी करण्यात आली आहे. बीड जिल्ह्यात दुसरा संतोष देशमुख होऊ नये याची सरकारने जबाबदारी घेतली पाहिजे